बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

सध्या सर्वञ गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.सगळेजण घराची साफसफाई ते मखरापर्यंतची सगळी तयारीत आहेत. सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी,पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी करण्याची तयारी सुरु आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे बाप्पाला घरी आणताना मूर्तीला झाकण्यासाठी असणारे उपर्ण किंवा रुमाल. जवळपास सर्वजणच जण बाप्पाला घरी आणताना मूर्तीचा चेहरा झाकून आणली जाते. पण कधी विचार केला आहे की यामागे नक्की काय कारण असू शकतं? धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा काय? जाणून घ्या… चला जाणून घेऊयात.

बाप्पाला घरी आणताना रुमालाने का झाकतात?

अनेकदा आपण पाहतो, गणेशोत्सवात गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना अनेक ठिकाणी मूर्तीवर स्वच्छ रुमाल किंवा वस्त्र झाकण्याची परंपरा आहे. मात्र ही पद्धत सर्वत्र बंधनकारक धार्मिक विधी नसून स्थानिक आणि कौटुंबिक परंपरेचा भाग आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया…

मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी

गणपतीची मूर्ती घरी आणताना तिच्यावर वस्त्र झाकणे हे देवतेला आदर देण्याचे प्रतीक मानले जाते. मूर्तीची स्थापना होईपर्यंत तिचे पावित्र्य आणि सन्मान राखण्याची भावना त्यामागे असते.

दृष्ट लागू नये, अशी श्रद्धा

काही भागांत बाप्पाला रुमालाने झाकण्यामागे वाईट नजर लागू नये अशी श्रद्धा असते.विशेषतः सजवलेली सुंदर मूर्ती मिरवणुकीतून घरी आणताना ही पद्धत केली जाते.

स्थापना होईपर्यंत मूर्ती झाकण्याची प्रथा

घरातील पूजेच्या जागेवर बाप्पाची विधिवत स्थापना होईपर्यंत मूर्तीवर वस्त्र ठेवले जाते. स्थापना झाल्यानंतर रुमाल काढून बाप्पाचे दर्शन घेतले जाते.

तर…गणेशपूजा अपूर्ण ठरणार का?

धर्मग्रंथांमध्ये ‘गणपती घरी आणताना रुमालाने मूर्ती झाकणे अनिवार्य आहे’ असा सार्वत्रिक नियम नाही. त्यामुळे ही प्रथा श्रद्धेने पाळता येते. न पाळल्याने गणेशपूजा अपूर्ण ठरते, असंं काहीही मान्यता नसते.

बाप्पाला घरी आणल्यावर रुमाल कधी काढावा?

घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणताना रुमाल/ उपर्ण झाकण्याची प्रथा काही घरांमध्ये असते
तो रुमाल मुख्यतः बाप्पांना नजर लागू नये, प्रवासात मूर्तीवर धूळ-माती पडू नये
तसेच बाप्पांचे आगमन मंगल पद्धतीने व्हावे या श्रद्धेमुळे झाकतात
घरी पोहोचल्यानंतर, स्थापना करण्यापूर्वी रुमाल काढतात
त्यानंतर बाप्पांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा व प्राणप्रतिष्ठा केली जाते
ही प्रथा सर्व ठिकाणी किंवा प्रत्येक कुटुंबात सारखी नसते, घरच्या परंपरेनुसार पद्धत बदलू शकते

गणेश चतुर्थीची पूजा, स्थापनेचा शुभ मुहूर्त….

पंचांगानुसार गणेश चतुर्थीची चतुर्थी तिथी 14 सप्टेंबरच्या सकाळी सुरू होते आणि गणेशपूजेसाठी दुपारच्या सुमारास मुहूर्त आहे
गणेश चतुर्थीची पूजा/स्थापना मुहूर्त – पंचांग गणनेनुसार, सकाळी 11:16 ते 1:44 दुपारी असा आहे
विविध पंचांगांमध्ये गणेशपूजेचा मुहूर्त साधारण सकाळी 11 ते दुपारी 1.30 या कालावधीत दिला आहे

आधी कोणती पूजा? हरतालिका कि गणेश चतुर्थी?

यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थीच्या पूजेचे नियोजन एकाच दिवशी करावे लागणार आहे. विशेषतः हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांसाठी पूजा कधी करायची? उपवास कधी सोडायचा, तसेच गणेशस्थापना आणि पूजा कोणत्या क्रमाने करायची, याबाबत घरच्या परंपरेनुसार नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

14 सप्टेंबर 2026, सोमवार

सकाळी हरतालिका व्रताची पूजा करावी.
त्यानंतर गणेश चतुर्थीची स्थापना आणि पूजा करावी.
हरतालिका व्रताचा संकल्प असल्यास दिवसभर उपवास सुरू ठेवावा.
15 सप्टेंबर 2026, मंगळवार सकाळी स्नान करून हरतालिकेची उत्तरपूजा केल्यानंतर पारणे करावे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या…

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    ठाणे एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. फरार इंडियन मुजाहिद्दिनच्या दहशतवादी तारीक खानच्या मुलीला एटीएसने अटक केली आहे. नमिरा तारीक खान असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव असून तिला ⁠मुंब्र्यातून…

    Leave a Reply

    You Missed

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा