“कामाचं बोला” म्हणणाऱ्या शिंदेंना मनसे नेत्यानं दिलं प्रत्युत्तर; ट्विट करून पाठवली कामांची यादी !

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना, अलीकडेच एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे-ठाकरे गट युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर चिडून “कामाचं बोला!” असं उत्तर दिलं. त्यांच्या या विधानावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आणि नेते राजू पाटील यांनी थेट प्रत्युत्तर देत ‘कामांची यादी’च त्यांच्यासमोर ठेवली आहे.

राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानाचा उद्धृत करत ट्विटरवर एक सडेतोड पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिंदेंना थेट प्रश्न विचारले आहेत आणि पालकमंत्री व नगरविकासमंत्री या नात्याने उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

राजू पाटील म्हणाले काय?

जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……!
परवा आमचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर पत्रकाराला चिडून बोलले की, ‘कामाचं बोला!’ मग मीही काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोय. किमान नगरविकास मंत्री आणि आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे,” असं म्हणत त्यांनी पुढील प्रश्न विचारले :

विचारलेले प्रश्न हे स्थानिक विकासकामांवर लक्ष केंद्रित करणारे:

पलावा पुल व लोकग्राम पुल – या दोन्ही पुलांचे काम किती वर्षांपासून प्रलंबित आहे, तरी ते कधी पूर्ण होणार?

दिवा रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) – या प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, आणि वाहतूक कोंडीतून दिवा परिसराला कधी दिलासा मिळणार?

कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन – बिल्डरांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला का? जर भूसंपादन न झालं, तर वाहतुकीला त्रास देणारे हे काम थांबवणार का?

कल्याण-शीळ रस्त्यावरचे शेतकरी आणि तिसरी लाईन – रस्त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना मोबदला कधी? आणि तिसरी लाईन कधी सुरू होणार?

पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामे – या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक अडथळलेली आहे. ती हटवून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू होणार?

अमृत योजना – २७ गावांसाठी असलेली ही पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार?

१४० एलएलडी पाण्याचा कोटा – नवी मुंबईला देण्यात आलेला कल्याण-डोंबिवलीकरांचा पाण्याचा हक्क कधी परत मिळणार?

दिवा डंपिंग ग्राउंड – अनधिकृतपणे सुरू असलेलं हे डंपिंग कधी बंद होणार?

नवीन घेतलेल्या १४ गावांचा विकास निधी – या गावांसाठी आवश्यक असलेले ५९०० कोटी रुपयांचे पॅकेज कधी मंजूर होणार?

अनधिकृत बांधकामे – मानपाडा रोड व कल्याण-शीळ मार्गावरील अनधिकृत बांधकामे कधी हटवली जातील?

राजकीय पातळीवर हल्लाबोल

राजू पाटलांचा हा ट्विट म्हणजे एका प्रकारे शिंदेंच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हल्ला मानला जात आहे. ‘कामाचं बोला’ म्हणणाऱ्या शिंदेंनाच कामांवरून जाब विचारल्यामुळे हा राजकीय शाब्दिक सामना चांगलाच गाजतो आहे.

दरम्यान, या आरोपांवर आणि प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. मात्र, या मुद्द्यांवर पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

  • Related Posts

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार