केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? मराठी न बोलल्याने भाषेला भोकं पडतात का? असे प्रश्न तिने व्हिडीओ शेअर करून उपस्थित केलेत.बरं अचानक अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा हेतू काय फक्त प्रसिद्धीसाठी कि आणखी काही.
अभिनेत्री केतकी चितळे हि तिच्या एपिलेप्सीवरील पोस्टमुळे चर्चेत आली.या आजारामुळे तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. जुलै २०२० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठी केतकीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. केतकीने 1 मार्च रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये बौद्ध समाजावर टीका केल्याने आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला होता. केतकीविरोधात त्यावेळी अट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकीला 15 मे 2020 रोजी अटक करण्यात आली होती.केतकी चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली, तसंच अंडीही फेकण्यात आली. शिवाय, कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आता तर राज्यात आधीच हिंदी-मराठी भाषेचा वाद उफाळला असताना आणि मायबोली मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणूस एकवटला असताना, केतकीने मराठीबाबत केलेली ही विधाने अनेकांना चीड आणणारी ठरली आहेत. मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना तिच्या या वक्तव्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या या वक्तव्याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..

  • Related Posts

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    मुंबई- ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे येत्या रविवारी नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गुन्हे मागे घेताच मामा राजवाडे आणि सुनील बागुल…

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    मुंबई – मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करताच न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्वरित राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

    Leave a Reply

    You Missed

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी