अपात्र धारावीकर कुठे जाणार? पुनर्विकासाच्या निर्णयावर पडला शिक्कामोर्तब !

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावले न गेलेल्या ‘अपात्र’ रहिवाशांचे पुनर्वसन आता मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर होणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी तब्बल २५६ एकर सॉल्टपॅन जमीन पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील ही जमीन वापरण्यात येणार आहे.

या निर्णयावर काही पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेतला असताना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.”ही संपूर्ण जमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या पश्चिमेकडील असून, अनेक वर्षांपासून समुद्राच्या संपर्काबाहेर आहे. त्यामुळे ती विकासासाठी सुरक्षित आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

तसेच या जमिनीवर गेल्या १० वर्षांपासून मीठ उत्पादन थांबवण्यात आलं असून, सॉल्ट कमिशनर ऑफ इंडिया यांनी ती अधिकृतपणे बंद केली आहे. त्यामुळे ही जमीन आता घरबांधणीसाठी वापरणे पर्यावरणीय दृष्टीनेही योग्य आहे, असं श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं.

कायदेशीर प्रक्रिया आणि पर्यावरण मंजुरीचे पालन

श्रीनिवास पुढे म्हणाले, “सर्व पर्यावरणीय आणि कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्यात येतील. ही जमीन कोणत्याही संवेदनशील पर्यावरण क्षेत्रात येत नाही. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्प अडथळ्याशिवाय राबवता येईल.”

विकास आराखड्यात मान्यता

२०१८ मध्ये मंजूर झालेल्या मुंबई विकास आराखडा २०३४ नुसार या जमिनी स्वस्त गृहप्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या (शिंदे आणि ठाकरे गट) नेतृत्वात सरकार कार्यरत होते.

याआधीही २००७ मध्ये काँग्रेस सरकारने २,००० हेक्टर सॉल्टपॅन जमिनीचा वापर पुनर्वसनासाठी सुचवला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना म्हटलं,“सॉल्टपॅन जमीन न वापरता मुंबईचा पुनर्विकास शक्य नाही.”

मेट्रोसाठी सॉल्टपॅन, मग घरांसाठी का नाही?

वर्तमानात केंद्र सरकारने वडाळ्यात ५५ एकर सॉल्टपॅन जमिनीवर आपले कार्यालय आणि निवासी इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. कांजूरमार्गमधील १५ एकर जमीन मेट्रो लाईन ६ साठी वापरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही चार मेट्रो लाईन्ससाठी सॉल्टपॅन जमीन वापरण्याचा प्रस्ताव होता.

  • Related Posts

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

    महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनर्उच्चारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या उपोषणामुळे हा मुद्दा एकदाच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा वेळी, राज्य सरकार कोणत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष