भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाला शुक्रवारी रात्री उशिरा आणखी धार आली. पहाटे १.४० वाजता पाकिस्तानने पंजाबमधील भारतीय हवाई तळांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात लष्करी रुग्णालये व श्रीनगरजवळील एका शाळेचा समावेश होता, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्नल कुरेशींच्या म्हणण्यानुसार, भारताने संयम राखतही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सियालकोटमधील हवाई तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असून, लाहोरजवळून नागरी विमानसेवेच्या आडून पाकिस्तानकडून हल्ला केल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार खान आणि सुकूर येथील लष्करी तळांवर हल्ले चढवले. तसेच कुसूर येथील रडार व सियालकोटच्या तळालाही लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानने भारताच्या पश्चिमी सीमेवर २६ ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप भारताने केला आहे. ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि ‘लॉटरिंग ड्रोन्स’च्या मदतीने हे हल्ले करण्यात आले. मात्र, भारताने बहुतांश हल्ले निष्फळ ठरवले असून, उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा येथे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्य केले आहे.

कर्नल कुरेशी म्हणाल्या, “पाकिस्तानकडून वारंवार फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. भारतीय तळांवरील हल्ल्यांबाबत दिशाभूल केली जात आहे. मात्र भारताने स्पष्ट भूमिका घेतली असून, पाकचे दावे आम्ही फेटाळून लावत आहोत.”

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल कुरेशी आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यां Vyomika Singh यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या अपप्रचार मोहिमेवरही चिंता व्यक्त केली.

महत्त्वाच्या घडामोडी (Flash Points):
• पाकिस्तानचा पहाटे १.४० वाजता भारताच्या हवाई तळांवर हल्ला
• भारतीय वायुदलाने पाच पाक तळांवर केले चोख प्रत्युत्तर
• सियालकोट हवाई तळ उद्ध्वस्त, कुसूरचा रडार प्रणाली नष्ट
• लाहोरमधून नागरी विमान मार्गांचा लष्करी वापर
• सीमारेषेवर २६ ठिकाणी पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न
• उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भटिंडा येथे मर्यादित नुकसान

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार…

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ.  रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. दि. ३…

    Leave a Reply

    You Missed

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६