दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी
जळकोट, प्रतिनिधी
दिव्यांग, अंधदृष्टीही, वयोवृद्ध ,यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गृहमतदानाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती ,मागील नगरपालिका व महानगरपालिका व आत्ता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांगाना, अंधदृष्टीही यांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग, अंध व वयोवृद्ध यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिव्यांग, दृष्टीहीन बांधवांना केंद्रापर्यंत ही जाता येत नाही. मतदान केंद्रावर दिव्यांगाना वेगळी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांग, दृष्टीहीन,वयोवृद्ध, बांधवांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा योग्य नाही. ग्रहमतदान करून घेतले तर त्यांना शारीरिक, व मानसिक त्रास झाला नसता आता त्यांना या मतदान केंद्रावर जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताण घ्यावा लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग, दृष्टिहीन, वयोवृद्ध यांना त्यांची शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना गृह मतदान करून घेतले तर चांगली झाले असते, बऱ्याच दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.दिव्यांगाना मतदान केंद्रावर मतदान पेटी पण पोहोचत नाही तर त्यांनी मतदान कसे करावे हा मोठा प्रश्न असून अनेक दिव्यांग बांधवांचे मतदान हे उघड होत आहे त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे याला जबाबदार कोण?
मुख्य संपादक अमोल भालेराव








