दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

जळकोट, प्रतिनिधी

दिव्यांग, अंधदृष्टीही, वयोवृद्ध ,यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गृहमतदानाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती ,मागील नगरपालिका व महानगरपालिका व आत्ता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांगाना, अंधदृष्टीही यांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग, अंध व वयोवृद्ध यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिव्यांग, दृष्टीहीन बांधवांना केंद्रापर्यंत ही जाता येत नाही. मतदान केंद्रावर दिव्यांगाना वेगळी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांग, दृष्टीहीन,वयोवृद्ध, बांधवांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा योग्य नाही. ग्रहमतदान करून घेतले तर त्यांना शारीरिक, व मानसिक त्रास झाला नसता आता त्यांना या मतदान केंद्रावर जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताण घ्यावा लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग, दृष्टिहीन, वयोवृद्ध यांना त्यांची शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना गृह मतदान करून घेतले तर चांगली झाले असते, बऱ्याच दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.दिव्यांगाना मतदान केंद्रावर मतदान पेटी पण पोहोचत नाही तर त्यांनी मतदान कसे करावे हा मोठा प्रश्न असून अनेक दिव्यांग बांधवांचे मतदान हे उघड होत आहे त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे याला जबाबदार कोण?

मुख्य संपादक अमोल भालेराव

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

“शिक्षणासाठी वयाची अट नसते… फक्त जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते!” ही ओळ जळकोट तालुक्यातील विराळ गावच्या संघशीला पांडुरंग वाघमारे यांनी अक्षरशः खरी करून दाखवली आहे. सन 2004-05…

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

Leave a Reply

You Missed

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

  • By Admin
  • April 22, 2026
रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई