सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३० एकर वनजमीन पुन्हा वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना मोठा झटका बसला आहे.

नारायण राणेंचा निर्णय रद्द

सन १९९८ मध्ये, युती सरकारच्या काळात तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी पुण्यातील ही जमीन एका खासगी व्यक्तीला दिल्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांतच ती जमीन ‘रिची रिच सोसायटी’ला दोन कोटींना विकण्यात आली आणि पुढे त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभारण्याचा डाव आखण्यात आला.

अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद

या प्रकरणात तत्कालीन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उपवन संरक्षक अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमिनीस बिगरशेती घोषित करून बांधकामाचा मार्ग मोकळा केला. मात्र सजग चेतना मंच या सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या व्यवहाराविरोधात आवाज उठवला.

CECचा अहवाल आणि पुराव्यांची फेरफार

सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत २००२ मध्ये सेंट्रली एम्पॉवर्ड कमिटी (CEC) स्थापन केली. समितीने पुण्याला भेट देऊन अहवाल सादर केला, ज्यात तत्कालीन मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. इतकंच नव्हे, तर पुरातत्त्व खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करून बनावट पुरावे सादर करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं. या बनावामुळे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

देशभरात फेरचौकशीचे आदेश

या निर्णयात सरन्यायाधीश गवई यांनी केवळ पुण्यापुरतेच नव्हे, तर देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत की, अशाप्रकारे जर कुठेही वनजमिनी हडप केल्या गेल्या असतील, तर त्यांची तपासणी करून एक वर्षाच्या आत त्या सरकारजमा करण्यात याव्यात. बांधकाम झालेल्या जमिनी बाबतीत बाजारभावानुसार मोबदला वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

“हे राजकारणी-बिल्डर-अधिकाऱ्यांच्या संगनमताचे उदाहरण”

निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “ही केस म्हणजे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यातील संगनमताचे जिवंत उदाहरण आहे.” या निर्णयाने न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेला चालना मिळाली असून, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही तो एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या…

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा बदल करत २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड