वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

वसई (पालघर) | 5 जून 2025 – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा व वसई तालुक्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त म्हाडा कॉलनी, वसई येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका संघटक आदरणीय श्री. रणजीत माने यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव श्री. बापू परब, कोकण विभाग अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील सर, वसई तालुका संघटक भाग्यश्री परब, तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपचे पर्यावरणप्रेमी महिला व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देत, श्री. माने यांनी आवाहन केले की – “प्रत्येकाने आपल्या राहत्या घरासमोर, सोसायटीत एक झाड नक्की लावावे व आमच्या संस्थेला एक झाड डोनेट करावे. एक झाड आईसाठी, वडिलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी द्यावे.”

त्याचप्रमाणे, आपल्या परिसरात झाडे लावण्यासाठी जागा असेल तर ती आधीपासून निश्चित करून संस्थेला कळवावी, जेणेकरून संबंधित ठिकाणी वृक्षारोपण करता येईल, असेही त्यांनी सुचवले.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केल्याबद्दल आदरणीय श्री. रणजीत माने सर यांचे उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींनी अभिनंदन केले व आभार मानले.

  • Related Posts

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबई, 29 मे 2025: जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव…

    महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

    Leave a Reply

    You Missed

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी