जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

मुंबई, 29 मे 2025:
जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले. या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला.

सोहळ्याला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर, आमदार हरून खान, एकदा मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद, प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, भाजपा प्रवक्ते विनोद शेलार, अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन, माजी नगरसेविका अनिता बागवे, दिग्दर्शक दीपक राणे, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर, लक्ष्मण डोंगळे, आणि माता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विजय पाटकर म्हणाले, “संपादक अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जागृत महाराष्ट्र जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अथक कार्य करत आहे. हे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे.”
आमदार हरून खान यांनी जागृतच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
संगीता संजय सुतार यांनी सांगितले, “जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे.”
विनोद शेलार यांनी नमूद केले, “मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करते, हे खूप मोठे योगदान आहे.”
संजय मानाजी कदम यांनी म्हटले, “जागृत महाराष्ट्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहे.”

खालील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले:
1. अंजली पटेल– जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
2. रेश्मा राजन – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)

4. संकेत माने– जागृत आदर्श दिग्दर्शक,लेखक
5. गुंजनताई गोळे – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
6. नितेश कराळे मास्तर – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
7. योगेश राजेंद्र चव्हाण – जागृत समाजसेवक पुरस्कार
8. मारुती नागोराव घोटरे – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
9. अॅड. शिवाजी धनगे व अॅड. वनिता – जनसेवा ओल्ड एज – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
10. बापू शांताराम परब – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
11. राकेश चौधरी – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
12. विशाल गंगाधरराव दादेवाड – जागृत समाजसेवक पुरस्कार
13. लक्ष्मण डांगले – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
14. वैशाली निसार अली सय्यद महाडिक– जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
15. दीपक संदानशिव – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
16. नीला दिगंत चंपाणेरी – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
17. भानजी मुलजी वाला – जागृत जनसेवा पुरस्कार
18. झाहीद शेख – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
19. गायत्री विजयन नायर – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
20. पूजा पांडे– जागृत आदर्श कलाकार पुरस्कार
21. हरिनाथ यादव – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
22. रेहाना शेख – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर)
23. बलदेव खुमार– जागृत साहित्य पुरस्कार
24. सबा खान – जागृत समाजसेविका पुरस्कार

जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव, संचालक सुरज भालेराव, कार्यकारी संपादक पंकज हेलोडे, आणि गजानन बनसोड यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    सध्या सर्वञ गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.सगळेजण घराची साफसफाई ते मखरापर्यंतची सगळी तयारीत आहेत. सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी,पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी करण्याची तयारी सुरु आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट…

    “श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

    “श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव”   विराळ, ता. जळकोट, जि. लातूर येथे श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, मुलांना शैक्षणिक मदत…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा