बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्यात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. एवढ्या दिवस दडी मारलेल्या पावसाची अखेर राज्यावर कृपा झालेली पाहायला मिळत आहे. 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह खानदेश विदर्भातील अनेक जिल्हे आणि भागांना पावसाची मोठी आस आहे.

पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडमार्ग हा कमी दाबाचा पट्टा विदर्भासह मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्यावर सध्या आभाळमाया आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातहाी पाऊस सांगितला आहे. गेल्या 20-25 दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. पीकं धोक्यात आली होती. तर दुसरीकडे जलसाठेही प्रभावित झालेली पाहायला मिळत होती. शेतकरीही फार चिंतेतत होता. पण आता सुरु झालेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

20 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही भागात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दमदार पाऊस पडेल. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यात दूरपर्यंत पाऊस धडकेल. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इतर भागात मेघगर्जनेसह धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप

मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.अनेक भागात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी वसई विरार मध्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम सह अधूनमधून जोरदार पाऊस सलग सुरू आहे.

मुंबईतील पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला अडळथा

पण सलग पडणाऱ्या पावसाने काही सकल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. आभाळ पूर्ण भरून आले आहे. दिवसभर असाच पाऊस सुरू राहीलातर गणरायाच्या आगमनात विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सकाळ च्या वेळात शहरातील वाहतूक, आणि विरार वून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत. पण मुंबईतील पावसामुळे गणेशोत्सवाच्या आगाऊ तयारीला माञ पावसाने अडथळा आणला आहे.

मुंबईकरांचे नियोजन बिघडवलं

बाप्पाच्या आगमनानिमित्त शहरात आणि उपनगरांमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच अचानक मुसळधार पावसाने मुंबईकरांचे नियोजन बिघडवले आहे. अनेक दिवसांच्या कोरड्या काळानंतर आलेल्या या दमदार पावसामुळे भक्तांना दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे मूर्ती आणणे, सजावट आणि खरेदीची लगबग, तर दुसरीकडे रस्त्यांवर साचलेले पाणी आणि वाहतुकीतील कोंडी.

रात्रीपासून मलबार हिल, गिरगाव परिसरात जोरदार पाऊस

रात्रीपासून मलबार हिल, गिरगाव त्यासोबतच संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या अशाच पद्धतीने पावसाची संततधार सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढीत तीन ते चार तास मुंबईत मुळसधार पाऊस पडणार असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रशासन देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

धुळ्यात जोरदार पावसाच्या सरी

धुळे शहरासह जिल्ह्यात तब्बल 43 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली, तर शेतीच्या दृष्टीने या पावसाने काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कपाशीच्या बोंडांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नागपूर परिसरात पावसाची हजेरी

20 ते 22 दिवसांचा खंड पडल्यानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पावसाचं आगमन झाले. पावसामुळे खरीपातील काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. काल दुपारीही नागपुरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस समाधानकारक झाल्यास पिकांना काहीसा दिलासा मिळून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या…

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    सध्या सर्वञ गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.सगळेजण घराची साफसफाई ते मखरापर्यंतची सगळी तयारीत आहेत. सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी,पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी करण्याची तयारी सुरु आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट…

    Leave a Reply

    You Missed

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट