“‘छावा’ हा वाईट सिनेमा, हा कोणता इतिहास?'”– आस्ताद काळेच्या थेट वक्तव्यानं सोशल मिडीयावर खळबळ !

नावाजलेला अभिनेता आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी ‘छावा’ सिनेमाविषयी केलेल्या थेट विधानामुळे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप सोडली. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच तो अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. आता वाद शमल्यावर, या सिनेमावर आस्ताद काळेने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

आस्तादने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, “’छावा’ हा एक वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणूनच नव्हे तर इतिहासाच्या दृष्टीनेही तो त्रासदायक आहे. सर्व बाजूंनी तो अपयशी आहे,” असं त्याने ठामपणे नमूद केलं.

त्याच्या पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत – “महाराणी सोयराबाई यांनी औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं, याचे काय ऐतिहासिक पुरावे आहेत? त्या काळातील राजकीय घडामोडी पाहता, अशा घटना घडल्या होत्या का? औरंगजेब वयस्क आणि आजारी असताना तो इतक्या वेगाने कारवाई करू शकतो का?”

इतकंच नाही, तर आस्तादने सिनेमात दाखवलेल्या काही दृश्यांवरही प्रश्न उपस्थित केले. “सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर पान लावत आहेत आणि ते खात आहेत – हे कुठल्या ऐतिहासिक आधारावर?” अशा स्वरूपाचे प्रश्न त्याने उपस्थित केले.

विशेष बाब म्हणजे, आस्ताद काळे याने ‘छावा’ सिनेमात सूर्या ही भूमिका साकारली होती. सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावूनही, त्याने उघडपणे टीका केल्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

एका नेटकऱ्याने विचारले, “सिनेमात काम करून आता अचानक एवढे प्रश्न का आठवले?” तर दुसऱ्याने म्हटलं, “राजकीय मंडळींनी आधीच आक्षेप घेतला होता, पण तू त्यावेळी गप्प का होतास?”

सध्या आस्ताद काळेच्या या पोस्टवर जोरदार चर्चा रंगली असून, सिनेमाच्या ऐतिहासिक अचूकतेबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

  • Related Posts

    पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

    22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार