संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

वैजापूरमध्ये रस्त्याच्या कामावरून वाद उफाळल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजपचे कार्यकर्ते कैलास पवार यांनी आमदार बोरनारे यांच्यावर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी ते तीन तास वैजापूर पोलिस ठाण्यात थांबले, तरीही पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

कैलास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराशेजारी नगरपरिषदेच्या लेआऊटमधील प्लॉट नंबर 48 मध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आमदार रमेश बोरनारे, त्यांचे कार्यकर्ते आणि नगर परिषदेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी आमदारांनी ठेकेदाराला प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढण्याचे आदेश दिले. यावर पवार यांनी लेआऊट पाहण्याची मागणी केली असता, आमदार बोरनारे चिडले आणि त्यांनी पवार यांना धमकावत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस. तुझी फॅमिली संपवायची आहे,” अशी धमकी देत आमदारांनी मारहाण केली, असा आरोप पवार यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तीन तास उलटूनही तक्रार नोंदवली नाही. “पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करू,” असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार रमेश बोरनारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “नागरिकांनी रस्त्याच्या अडचणींबाबत आपल्याकडे अर्ज दिला होता. त्यानुसार आपण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यावेळी कैलास पवार अचानक आले आणि त्यांनी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे वाद झाला.”

सध्या या प्रकरणामुळे वैजापूर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत…

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. हनुमान मंदिराच्या बांधकामादरम्यान दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराचा काही भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द