आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

आयपीएल 2025 च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जल्लोषात दुर्दैवी घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा RCBच्या विजय जल्लोषासाठी हजारो चाहते स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.

RCB ने यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने 6 धावांनी विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण कर्नाटकात आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्टरी सेलिब्रेशन’साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाहत्यांनी गेट क्रमांक 3 जवळ मोठी धावपळ केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि चेंगराचेंगरीत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, अनेक जखमींवर स्थानिक बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीमुळे स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच विधानसौधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी RCB टीमचा सत्कार केला होता. त्यानंतर टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल होणार होती. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी प्रकार घडला.

  • Related Posts

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी  २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयाने संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघातील खेळाडूंनीही हा आनंद…

    भारतीयांच्या डोक्यावर अभिमानाचा तुरा

    दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात…

    Leave a Reply

    You Missed

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी