आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

आयपीएल 2025 च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जल्लोषात दुर्दैवी घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा RCBच्या विजय जल्लोषासाठी हजारो चाहते स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.

RCB ने यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने 6 धावांनी विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण कर्नाटकात आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्टरी सेलिब्रेशन’साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाहत्यांनी गेट क्रमांक 3 जवळ मोठी धावपळ केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि चेंगराचेंगरीत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, अनेक जखमींवर स्थानिक बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीमुळे स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच विधानसौधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी RCB टीमचा सत्कार केला होता. त्यानंतर टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल होणार होती. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी प्रकार घडला.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दोहा मैदानावर वैभव सूर्यवंशीचा तुफानी विस्फोट! 42 चेंडूत 144 धावा – India A ची दणदणीत कामगिरी

    दोहा | India A vs U.A.E., ग्रुप-B दुसरा सामनादोहा येथे सुरू असलेल्या ग्रुप-B च्या India A आणि युएई संघातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने आज तब्बल तुफानी खेळ करत क्रिकेटप्रेमींना वेड लावले.…

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    मुंबई-आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे. घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचना विश्वविक्रम केला आहे. मात्र जय जवान…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड