आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

आयपीएल 2025 च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जल्लोषात दुर्दैवी घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा RCBच्या विजय जल्लोषासाठी हजारो चाहते स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.

RCB ने यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने 6 धावांनी विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण कर्नाटकात आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्टरी सेलिब्रेशन’साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाहत्यांनी गेट क्रमांक 3 जवळ मोठी धावपळ केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि चेंगराचेंगरीत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, अनेक जखमींवर स्थानिक बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीमुळे स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच विधानसौधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी RCB टीमचा सत्कार केला होता. त्यानंतर टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल होणार होती. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी प्रकार घडला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दोहा मैदानावर वैभव सूर्यवंशीचा तुफानी विस्फोट! 42 चेंडूत 144 धावा – India A ची दणदणीत कामगिरी

    दोहा | India A vs U.A.E., ग्रुप-B दुसरा सामनादोहा येथे सुरू असलेल्या ग्रुप-B च्या India A आणि युएई संघातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने आज तब्बल तुफानी खेळ करत क्रिकेटप्रेमींना वेड लावले.…

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    मुंबई-आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे. घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचना विश्वविक्रम केला आहे. मात्र जय जवान…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द