भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. मीराबाईने स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 190 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या विजयासह भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले.विशेष म्हणजे, मीराबाईचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक असून तिच्या नावावर आता एकूण चार राष्ट्रकुल पदके झाली आहेत.

भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक

मीराबाई चानूने 2018, 2022 आणि आता 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी 2014 च्या स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळालं असून, सुवर्ण जिंकल्यानंतर राष्ट्रगीताच्या वेळी मीराबाई भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

मीराबाई चानूचा हा विजय अधिक विशेष का ठरला?

मीराबाई चानूचा हा विजय अधिक विशेष ठरला, कारण तिने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नायजेरियाच्या रुथ न्यॉन्ग हिच्यापेक्षा तब्बल 22 किलो अधिक वजन उचलले.तिने यशस्वीपणे 105 किलो वजन उचलत सुवर्णपदक निश्चित केले. या पदकासह भारताने पदकतालिकेत सातवे स्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण तीन पदके जमा झाली आहेत. मीराबाई चानूने सुवर्ण, ऋषिकांत सिंहने रौप्य, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने कांस्यपदक जिंकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मीराबाई चानूचे कौतुक

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मीराबाई चानूचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचे वर्णन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान असे केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी म्हटले की, “भारतीय वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग सुवर्णपदके जिंकून आणि या स्पर्धांमधील आपले एकूण चौथे पदक मिळवून त्यांनी प्रत्येक भारतीयाला प्रेरित केले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील आव्हानांसाठी त्यांना शुभेच्छा…” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’

    नीट पेपर लीकमुळे देशभरातली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. या हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर पसरले आहेत. गेल्या अनेक…

    जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

    jj-mahanagar-blood-bank-maya-blood-centre-fda-action` मुंबई : रक्तसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांच्यावर मोठी कारवाई करत दोन्ही…

    Leave a Reply

    You Missed

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

    धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

    आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

    आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

    ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

    ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

    CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

    अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

    अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?