भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. मीराबाईने स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 190 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या विजयासह भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले.विशेष म्हणजे, मीराबाईचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक असून तिच्या नावावर आता एकूण चार राष्ट्रकुल पदके झाली आहेत.

भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक

मीराबाई चानूने 2018, 2022 आणि आता 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी 2014 च्या स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळालं असून, सुवर्ण जिंकल्यानंतर राष्ट्रगीताच्या वेळी मीराबाई भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

मीराबाई चानूचा हा विजय अधिक विशेष का ठरला?

मीराबाई चानूचा हा विजय अधिक विशेष ठरला, कारण तिने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नायजेरियाच्या रुथ न्यॉन्ग हिच्यापेक्षा तब्बल 22 किलो अधिक वजन उचलले.तिने यशस्वीपणे 105 किलो वजन उचलत सुवर्णपदक निश्चित केले. या पदकासह भारताने पदकतालिकेत सातवे स्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण तीन पदके जमा झाली आहेत. मीराबाई चानूने सुवर्ण, ऋषिकांत सिंहने रौप्य, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने कांस्यपदक जिंकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मीराबाई चानूचे कौतुक

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मीराबाई चानूचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचे वर्णन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान असे केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी म्हटले की, “भारतीय वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग सुवर्णपदके जिंकून आणि या स्पर्धांमधील आपले एकूण चौथे पदक मिळवून त्यांनी प्रत्येक भारतीयाला प्रेरित केले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील आव्हानांसाठी त्यांना शुभेच्छा…” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ अडचणीत आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना जवळपास 16 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल.आधी संघाची फलंदाजी सपशेल अपयशी…

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवशी, शनिवारी, भारताने आठ सुवर्णपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा