नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्यारे खान आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली.

आदित्य ठाकरेंना नाव बदलण्याचा सल्ला

महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी “सण साजरे करायला हवेत, पण सरकारने हस्तक्षेप करू नये” अशी भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून ‘खान’ किंवा ‘शेख’ ठेवावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने अशा प्रकारची वक्तव्ये करणं शोभत नाही.” त्यांनी यावरून ठाकरे कुटुंबाच्या परंपरेचा हवाला देत कठोर शब्दांत आदित्य यांच्यावर निशाणा साधला.

प्यारे खान यांना पलटवार

मंत्री राणेंच्या या वक्तव्यांवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस बजावली होती. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “प्यारे खान हे इस्लामला बदनाम करणारी भूमिका घेत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करावं, धार्मिक तेढ वाढवणारी विधानं देऊ नयेत.”

इको-फ्रेंडली बकरी ईदचा सल्ला

राणेंनी बकरी ईद इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची मागणी पुन्हा केली. “जसं हिंदू समाज इको-फ्रेंडली दिवाळी आणि होळी साजरी करतो, तसं मुस्लिम समाजानेही जबाबदारीने बकरी ईद साजरी करावी. सोसायट्यांमध्ये बकरे कापल्याने तणाव निर्माण होतो. त्यामुळे वाद, आणि उद्या दंगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत मी दिलेला सल्ला समाजाच्या हिताचाच आहे,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

ठाकरे बंधूंवर टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील एकात्मतेच्या हालचालींवरही राणेंनी टोला लगावत, “ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, तेच आता एकत्रीकरणाचे लेक्चर देतात. हे कितपत योग्य आहे, याचा विचार जनता करेल,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केली.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

    जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

    उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड