नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्यारे खान आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली.

आदित्य ठाकरेंना नाव बदलण्याचा सल्ला

महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी “सण साजरे करायला हवेत, पण सरकारने हस्तक्षेप करू नये” अशी भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून ‘खान’ किंवा ‘शेख’ ठेवावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने अशा प्रकारची वक्तव्ये करणं शोभत नाही.” त्यांनी यावरून ठाकरे कुटुंबाच्या परंपरेचा हवाला देत कठोर शब्दांत आदित्य यांच्यावर निशाणा साधला.

प्यारे खान यांना पलटवार

मंत्री राणेंच्या या वक्तव्यांवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस बजावली होती. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “प्यारे खान हे इस्लामला बदनाम करणारी भूमिका घेत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करावं, धार्मिक तेढ वाढवणारी विधानं देऊ नयेत.”

इको-फ्रेंडली बकरी ईदचा सल्ला

राणेंनी बकरी ईद इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची मागणी पुन्हा केली. “जसं हिंदू समाज इको-फ्रेंडली दिवाळी आणि होळी साजरी करतो, तसं मुस्लिम समाजानेही जबाबदारीने बकरी ईद साजरी करावी. सोसायट्यांमध्ये बकरे कापल्याने तणाव निर्माण होतो. त्यामुळे वाद, आणि उद्या दंगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत मी दिलेला सल्ला समाजाच्या हिताचाच आहे,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

ठाकरे बंधूंवर टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील एकात्मतेच्या हालचालींवरही राणेंनी टोला लगावत, “ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, तेच आता एकत्रीकरणाचे लेक्चर देतात. हे कितपत योग्य आहे, याचा विचार जनता करेल,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केली.

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश