नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्यारे खान आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली.

आदित्य ठाकरेंना नाव बदलण्याचा सल्ला

महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी “सण साजरे करायला हवेत, पण सरकारने हस्तक्षेप करू नये” अशी भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून ‘खान’ किंवा ‘शेख’ ठेवावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने अशा प्रकारची वक्तव्ये करणं शोभत नाही.” त्यांनी यावरून ठाकरे कुटुंबाच्या परंपरेचा हवाला देत कठोर शब्दांत आदित्य यांच्यावर निशाणा साधला.

प्यारे खान यांना पलटवार

मंत्री राणेंच्या या वक्तव्यांवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस बजावली होती. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “प्यारे खान हे इस्लामला बदनाम करणारी भूमिका घेत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करावं, धार्मिक तेढ वाढवणारी विधानं देऊ नयेत.”

इको-फ्रेंडली बकरी ईदचा सल्ला

राणेंनी बकरी ईद इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची मागणी पुन्हा केली. “जसं हिंदू समाज इको-फ्रेंडली दिवाळी आणि होळी साजरी करतो, तसं मुस्लिम समाजानेही जबाबदारीने बकरी ईद साजरी करावी. सोसायट्यांमध्ये बकरे कापल्याने तणाव निर्माण होतो. त्यामुळे वाद, आणि उद्या दंगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत मी दिलेला सल्ला समाजाच्या हिताचाच आहे,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

ठाकरे बंधूंवर टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील एकात्मतेच्या हालचालींवरही राणेंनी टोला लगावत, “ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, तेच आता एकत्रीकरणाचे लेक्चर देतात. हे कितपत योग्य आहे, याचा विचार जनता करेल,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला.…

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावरून सुरू झालेली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत धडकलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ सध्या…

    Leave a Reply

    You Missed

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई