पुणे महापालिका निवडणूक : बहुसदस्यीय प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले; ठाकरे गट आणि काँग्रेसचा विरोध

मुंबईसारखाच एक सदस्यीय प्रभाग पुण्यातही असावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुण्यात चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याच्या निर्णयावर ठाकरे गट आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. जर राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना लागू केली, तर आम्ही कोर्टात जाण्याचा मार्ग स्वीकारू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला आहे.

संजय मोरे म्हणाले की, “चार सदस्यीय प्रभागांमुळे नगरसेवकांना काम करणे अवघड होते. एक सदस्यीय प्रभाग असावा म्हणजे मतदारसंघाशी जवळीक वाढते आणि जबाबदारी निश्चित होते. सत्ता भोगण्याचा भाजपचा उद्देश असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणं-घेणं नाही.”

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही यास तीव्र शब्दांत विरोध नोंदवला. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा रडीचा डाव खेळत असून, चार सदस्यीय प्रभाग रचना करून ते सत्ता हस्तगत करण्याचा डाव आखत आहेत. आम्ही याला कटाक्षाने विरोध करू.”

राज्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात नवा प्रभागरचना आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत यापूर्वीप्रमाणेच 227 एक सदस्यीय प्रभाग राहणार असले तरी, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली अशा महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्यीय प्रभाग रचना लागू होणार आहे. पुण्यात यंदा 162 नगरसेवक निवडून येणार असून, त्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.

प्रभाग रचना वर्गवारी :
• अ वर्ग: पुणे, नागपूर
• ब वर्ग: ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
• क वर्ग: नवी मुंबई, वसई-विरार, छ. संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली
• ड वर्ग: अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी, नांदेड, धुळे आदी

ड वर्गातील महापालिकांमध्ये शक्यतो चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. परंतु काही ठिकाणी तीन किंवा पाच सदस्यीय प्रभाग असण्याचीही शक्यता आहे.

पुणेकरांचा प्रश्न कायम – “दाद कुणाकडे मागायची?”

गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे महापालिकेत नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. प्रभागांचा प्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या समस्या न मांडल्या जात असल्याचं चित्र आहे. अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य पुणेकरांचे हाल वाढले आहेत. त्यामुळे “दाद मागायची तरी कुणाकडे?” असा प्रश्न पुणेकरांमध्ये उपस्थित झाला आहे.

पुणेकरांचा रोष आणि राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता, बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यासंदर्भातील निर्णय पुढील काळात अधिक वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    मुंबई, दि. २० : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज आता नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. नगरसेवक हैदर अली…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड