शिमग्यापूर्वीच कोकण मार्गावरील रेल्वेसेवा अंशत: रद्द; प्रवाशांचे नियोजन कोलमडले !

होळी आणि जत्रांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी, सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांची सेवा २१ मार्चपर्यंत तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

सीएसएमटीतील कामांमुळे बदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी अलीकडेच त्याची पाहणी केली. गेल्या काही महिन्यांपासून १०, ११, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यातील १० आणि ११ क्रमांकाचे काम पूर्ण झाले असले तरी, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे काम अद्याप प्रलंबित आहे. हे पायाभूत काम २०२४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे लक्ष्य होते, मात्र विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे बदलले

तेजस, जनशताब्दीसारख्या महत्त्वाच्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत, तर मंगळुरू एक्सप्रेस ठाण्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. हा बदल २१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सामान घेऊन लोकल किंवा टॅक्सीचा पर्याय निवडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गांभीर्याने विचार करावा आणि पर्यायी सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

 

Related Posts

रोहा इंदरदेवमध्ये आगीचा तांडव: ४८ घरे जळून खाक, सुदैवाने सर्व सुखरूप !

रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीत भीषण वणवा लागल्याने तब्बल ४८ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके…

Leave a Reply

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू