मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

राजधानी मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मुंबई पुन्हा एकदा ‘तुंबई’ बनल्याचं चित्र आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला असून नव्याने सुरू झालेल्या मेट्रो 3 अर्थात ‘ॲक्वा लाईन’च्या भुयारी स्थानकांमध्ये पाण्याचे तळे साचल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे.

मेट्रोच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात आरे ते वरळीदरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पाडला होता. यावेळी सरकारने ही मेट्रो अत्याधुनिक असून, पावसाळ्यात कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या व्यवस्थेची पोलखोल झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

आदित्य ठाकरेंची मेट्रो स्थानकाला भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या भुयारी स्टेशनला भेट देत प्रशासनाच्या दाव्यांची चिरफाड केली. “स्थानकाचं काम सुरू आहे असं प्रशासन सांगतंय, मग उद्घाटन कोणत्या स्टेशनचं झालं?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. याशिवाय त्यांनी दादरच्या हिंदमाता भागातील पाणी साचलेल्या भागाचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.

“आम्ही चार वर्षांपूर्वीच हिंदमाता परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, भाजपने महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानंतर एकाच पावसात शहराची अवस्था बघायला मिळत आहे. पालिकेने कोणतीही पावसाळ्यापूर्व तयारी केली नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, “ही पोलखोल कशी? पाऊस जर 15 दिवस आधी आला तर काय होणार? 10 जूननंतर पावसाची तयारी केली जाते. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व यंत्रणा सतर्क आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मी कंट्रोल रूममधून सर्व स्पॉट पाहिले आहेत, आता कुठेच पाणी साचलेलं नाही. नरिमन पॉइंटला 252 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री सातत्यानं संपर्कात आहेत.”

दरम्यान, माहिम येथील म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली असून, संबंधित रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.

मुंबईतल्या पहिल्याच पावसात नव्याने सुरू झालेल्या भुयारी मेट्रोचा कारभार उघड झाल्याने राज्य सरकारची अडचण वाढली आहे. विरोधकांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र टीका केली असून, सरकारकडूनही प्रत्युत्तर देत स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. आता येणाऱ्या दिवसांत मुंबईचा पावसाळा प्रशासनासाठी किती कठीण ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश मुंबई : राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम सुरू केली आहे.…

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    लातूरमधील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळालेला बैल व गावकरी     लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील एका गरीब शेतकऱ्याची व्यथा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिनाथ गायकवाड…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द