मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

मालाड (प.) | प्रतिनिधी
मढ बीचवर शनिवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या १७ वर्षीय तन्मय विपुल तालुकदार या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी वटार गल्ली परिसरात आढळून आला. मात्र मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबाकडून तब्बल ८५०० रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तन्मय हा शनिवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसह मढ बीचवर पोहण्यासाठी गेला असता समुद्राच्या प्रवाहात ओढला गेला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर तीन दिवस त्याचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह वटार गल्ली भागात सापडला.

या दुर्घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी मालवणी पोलीस ठाण्यातील ‘मोरे’ या कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तन्मयच्या नातेवाईकांनी केला. मोठ्या विनवण्या व वादानंतर ८५०० रुपये देऊनच मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

तिन्ही दिवस उपाशी राहिलेल्या आणि मानसिक धक्क्याने कोलमडलेल्या तन्मयच्या आईला बीचवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची तत्काळ सरकारी मदत किंवा समुपदेशनाची व्यवस्था नव्हती, हे विशेष.

एकीकडे सरकार मोफत रुग्णवाहिका सेवा देत असल्याचे जाहिरातींमधून वारंवार सांगते, तर दुसरीकडे मृतदेहावरही पैसे उकळले जात असल्याचे चित्र मुंबईसारख्या महानगरात पाहायला मिळत आहे.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांना देण्यात आली असून, त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या ८५०० मध्ये  कोणी भागीदारी  होते की, खरंच त्याची चौकशी केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अशा घटना मुंबई शहरात घडत असतील तर पूर्ण राज्यातील खेड्या गावातील स्थिती काय असणार.खरं तर हा प्रकार पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे डोळे उघडण्याची गरज आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो, आणि मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांची पिळवणूक होते, ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या…

    Mahad Rada Case: 25 दिवसांनंतर 3 फरार आरोपी अटकेत | Mahad News

    महाड राडा प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार  महाड नगरपरिषद मतदानावेळी घडलेल्या महाड राडा प्रकरणात मोठी पोलिस कारवाई समोर आली असून, या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड