मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

मालाड (प.) | प्रतिनिधी
मढ बीचवर शनिवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या १७ वर्षीय तन्मय विपुल तालुकदार या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी वटार गल्ली परिसरात आढळून आला. मात्र मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबाकडून तब्बल ८५०० रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तन्मय हा शनिवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसह मढ बीचवर पोहण्यासाठी गेला असता समुद्राच्या प्रवाहात ओढला गेला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर तीन दिवस त्याचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह वटार गल्ली भागात सापडला.

या दुर्घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी मालवणी पोलीस ठाण्यातील ‘मोरे’ या कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तन्मयच्या नातेवाईकांनी केला. मोठ्या विनवण्या व वादानंतर ८५०० रुपये देऊनच मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

तिन्ही दिवस उपाशी राहिलेल्या आणि मानसिक धक्क्याने कोलमडलेल्या तन्मयच्या आईला बीचवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची तत्काळ सरकारी मदत किंवा समुपदेशनाची व्यवस्था नव्हती, हे विशेष.

एकीकडे सरकार मोफत रुग्णवाहिका सेवा देत असल्याचे जाहिरातींमधून वारंवार सांगते, तर दुसरीकडे मृतदेहावरही पैसे उकळले जात असल्याचे चित्र मुंबईसारख्या महानगरात पाहायला मिळत आहे.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांना देण्यात आली असून, त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या ८५०० मध्ये  कोणी भागीदारी  होते की, खरंच त्याची चौकशी केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अशा घटना मुंबई शहरात घडत असतील तर पूर्ण राज्यातील खेड्या गावातील स्थिती काय असणार.खरं तर हा प्रकार पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे डोळे उघडण्याची गरज आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो, आणि मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांची पिळवणूक होते, ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

    अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे; बेडरूम अन् बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

    प्रवास करताना हॉटेलमध्ये कुठे राहण्याची व्यवस्था करत असून तेव्हा नक्कीच आपण सगळेचजण आधी पाहतो ती सुरक्षा. कुठे छुपे कॅमेरे वैगरे नाही ना याची दक्षता घेऊनच आपण तिथे राहतो. पण हा…

    Leave a Reply

    You Missed

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी