मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

मालाड (प.) | प्रतिनिधी
मढ बीचवर शनिवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या १७ वर्षीय तन्मय विपुल तालुकदार या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी वटार गल्ली परिसरात आढळून आला. मात्र मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबाकडून तब्बल ८५०० रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तन्मय हा शनिवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसह मढ बीचवर पोहण्यासाठी गेला असता समुद्राच्या प्रवाहात ओढला गेला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर तीन दिवस त्याचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह वटार गल्ली भागात सापडला.

या दुर्घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी मालवणी पोलीस ठाण्यातील ‘मोरे’ या कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तन्मयच्या नातेवाईकांनी केला. मोठ्या विनवण्या व वादानंतर ८५०० रुपये देऊनच मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

तिन्ही दिवस उपाशी राहिलेल्या आणि मानसिक धक्क्याने कोलमडलेल्या तन्मयच्या आईला बीचवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची तत्काळ सरकारी मदत किंवा समुपदेशनाची व्यवस्था नव्हती, हे विशेष.

एकीकडे सरकार मोफत रुग्णवाहिका सेवा देत असल्याचे जाहिरातींमधून वारंवार सांगते, तर दुसरीकडे मृतदेहावरही पैसे उकळले जात असल्याचे चित्र मुंबईसारख्या महानगरात पाहायला मिळत आहे.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांना देण्यात आली असून, त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या ८५०० मध्ये  कोणी भागीदारी  होते की, खरंच त्याची चौकशी केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अशा घटना मुंबई शहरात घडत असतील तर पूर्ण राज्यातील खेड्या गावातील स्थिती काय असणार.खरं तर हा प्रकार पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे डोळे उघडण्याची गरज आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो, आणि मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांची पिळवणूक होते, ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    Watermelon death case:पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्लेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींना अवघ्या काही तासांतच…

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या…

    Leave a Reply

    You Missed

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!