उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

मुंबई – मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करताच न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्वरित राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आणि त्यानंतर सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. मात्र स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कोठडीतून बाहेर आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या आरोपींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्याची अशी मागणी राज्य सरकारने केली नाही. पण या आरोपींना एका महिन्यातआ आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात आदेश दिला तर तुरुंगातून बाहेर आलेल्या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे, सध्यातरी हे आरोपी तुरुंगाबाहेरच असणार आहेत.
11 जुलै 2006 मध्ये लोकलमध्ये 11 मिनिटांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. वांद्रे, माटुंगा रोड, माहिम जंक्शन, खार रोड, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली हे परिसर स्फोटाने हादरले होते. यात तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते. सत्र न्यायालयाने या प्रकरणात तब्बल 12 जणांना दोषी ठरवले. यात 5 जणांना फाशीची तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • Related Posts

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

    Leave a Reply

    You Missed

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप