मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली.

आंदोलनाची तारीख अखेर ठरली

सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर आता आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे प्रवास सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केलं. मुंबईकडे जाताना टप्प्याटप्प्याने मुक्काम करण्यात येणार असून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणी मुक्काम करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारकडून काही निर्णय जाहीर करण्यात आले असले तरी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा आरक्षणाशी संबंधित प्रमुख मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आंदोलन मुंबईत करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

मुंबईकडे जाताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन

मुंबईकडे जाताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहनही जरांगे यांनी समर्थकांना केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ न करता शांततेने आंदोलन करावे, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनासाठी येऊ न शकणाऱ्या मराठा बांधवांनी मार्गावर उपस्थित राहून आशीर्वाद, पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला रोखण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यास नकार दिला आहे. शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर असल्याचेही नमूद केले आहे.

आता १५ सप्टेंबरपासून जरांगेंचा मुंबईकडे प्रवास, मार्गातील मुक्काम आणि आझाद मैदानावरील आंदोलन याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

कसा असणार सराटी ते मुंबईचा मुक्काम

१५ सप्टेंबर – पहिला मुक्काम: पाटोदा ,जि. बीड

१६ सप्टेंबर -दुसरा मुक्काम: श्रीगोंदा , जि. अहिल्यानगर

१७ सप्टेंबर -तिसरा मुक्काम: हडपसर, जि. पुणे

१८ सप्टेंबर – चौथा मुक्काम: खोपोली, जि. रायगड

१९ सप्टेंबर – पाचवा दिवस: थेट आझाद मैदान, मुंबई, येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    सध्या सर्वञ गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.सगळेजण घराची साफसफाई ते मखरापर्यंतची सगळी तयारीत आहेत. सोबतच बाप्पाच्या स्वागतासाठी,पूजेसाठी लागणारे साहित्याची यादी करण्याची तयारी सुरु आहे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट…

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    ठाणे एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. फरार इंडियन मुजाहिद्दिनच्या दहशतवादी तारीक खानच्या मुलीला एटीएसने अटक केली आहे. नमिरा तारीक खान असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव असून तिला ⁠मुंब्र्यातून…

    Leave a Reply

    You Missed

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा