विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व समजून घेता यावे, या उद्देशाने वडाळा येथील एन.के.ई.एस. महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर आधारित भव्य प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आयोजन आणि प्रमुख उपस्थिती
हे प्रदर्शन महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जी.टी.बी. नगर येथील गुरु नानक महाविद्यालयाच्या डॉ. सुरिंदर कौर यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती लाभली. तर, मान्यवर म्हणून महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट सदस्या व खजिनदार भवानी भार्गव यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.नियोजन व समन्वय प्रभारी प्राचार्या डॉ. नेहा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रोफेसर शुभम पेडामकर व इतर शिक्षकवृंदां यांनी या प्रदर्शनाचे संयोजन केलं आहे.
प्रदर्शनातील मुख्य आकर्षणं असणार आहे विद्यार्थ्यांचे प्रकल्प. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय ज्ञानपरंपरा, प्राचीन विज्ञान, तत्त्वज्ञान, आणि संस्कृतीवर आधारित विविध आकर्षक मॉडेल व शोधप्रकल्प सादर केले आहेत.
इतर महाविद्यालयांचा प्रतिसाद
या प्रकल्पाला इतर महाविद्यालयांचा प्रतिसाद दिला आहे. या प्रदर्शनाला इतर विविध महाविद्यालयांतील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली आहे.’विद्यार्थी स्वयंसेवक मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन’ विभागाच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण सोहळ्याचे व्यवस्थापन आणि स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली.
उपक्रमाचा उद्देश व परिणाम
राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश शिक्षणात केला जात असताना, अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञान, इतिहास, विज्ञान आणि परंपरांविषयी जिज्ञासा निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.








