“कलम ३७०नंतर पुढचं पाऊल; पाकव्याप्त काश्मीर भारतात परतणार..”–जयशंकर यांचं मोठं विधान

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये एका महत्त्वाच्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचाच भाग असून तो परत मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. हा भाग भारतात परत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल.”

लंडनमधील थिंक टँक ‘चॅथम हाऊस’ येथे ‘भारताचा उदय व जागतिक भूमिका’ या विषयावर बोलताना त्यांनी काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत कोणती रणनीती अवलंबत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापनेसाठी भारत तीन टप्प्यांमध्ये काम करत आहे.

तीन टप्प्यांची प्रक्रिया

जयशंकर यांनी सांगितले की, “शांतता निर्माण करण्यासाठी पहिला टप्पा होता कलम ३७० हटवणे. हा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे – आर्थिक सुधारणा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे हा टप्पाही पार पडत आहे.”

“आता पाकव्याप्त काश्मीरची वेळ”

जयशंकर पुढे म्हणाले, “आम्ही कलम ३७० हटवलं, निवडणुका घेतल्या आणि आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा सोडवायची वेळ आली आहे. पाकिस्तानकडून बळकावण्यात आलेला हा भाग परत मिळवणं हेच काश्मीरच्या दिर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे. तो भाग भारतात परत आल्यानंतर सर्व समस्या सुटतील.”

अमेरिकेच्या धोरणांचा भारताला लाभ?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले, “अमेरिका बहुध्रुवीयतेच्या दिशेने वाटचाल करत असून हे धोरण भारताच्या हिताचं आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमत आहेत आणि यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील.”

जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे संकेत मिळाले असून, पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताची भूमिका अधिक ठाम होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

  • Related Posts

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीवर आता मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू