Your message has been sent
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा बदल करत २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.
या फेरबदलामुळे अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांमध्ये नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर येथे मनरेगा आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. भरत बास्टेवाड यांची लातूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बदली मुंबई येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
आता या फेरबदलामुळे लातूर जिल्ह्यातील प्रशासन अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नागरिकांचे लक्ष या नव्या बदलांकडे लागले आहे.








