दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.पण याच उत्साहाला गालबोट लागलं आहे ते गोविंदांच्या जखमी होण्यामुळे. गोविंदा जखमी होण्याची पहिली दुर्घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असताना मुंबईत मात्र या सणाला गालबोट लागलं आहे. 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी असं सजग नागरिक सांगत आहेत. आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 32 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.

दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष सुरू असताना मानवी मनोरे रचण्याच्या थरारात मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईत आतापर्यंत 32 गोविंदा जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. यांपैकी सीटी रुग्णालयात 29 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 25 जणांवर उपचार करून सोडलं. अजूनही चार गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. ईएस रुग्णालयात 2 गोविंदा जखमी आहेत. डब्ल्यूएस रुग्णालयात आणखी एक गोविंदा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. जखमींचा आकडा रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदांनी उत्साहाच्या भरात कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी काळजी घ्यावी.

३२ जखमींपैकी २८ जणांना डिस्चार्ज

तर अशा प्रकारे पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये एका गोविंदाला दुखापत झाली. त्याच्यावर आवश्यक उपचार केल्यानंतर त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागांतील रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण ३२ जखमींपैकी २८ जण घरी परतले असून, चार जणांवर उपचार सुरू आहेत.

दहीहंडीच्या थरारात गोविंदा पथके एकापाठोपाठ एक मानवी मनोरे रचत असताना प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सरकारी आणि महापालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पुण्यातही एका महिलेचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. लोखंडी कमान कोसळल्याने 45 वर्षीय सलमा पठाण यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, रात्री दहीहंडीची सजावट काढण्याचं काम सुरू असताना लोखंडाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला. त्यानंतर गंभीर अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सलमा पठाण यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात…

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    ५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी…

    Leave a Reply

    You Missed

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे