विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार मात्र पावसाचे आगमन पुन्हा एकदा होणार आहे.

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार सुरुवात

मुंबईतही काही भागात काल ५ सप्टेंबरपासूनच पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने वातावरण थंडगार झालं आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागाने मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे हवामान ढगाळ आणि दमट राहिलं, मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मात्रा आता मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 

शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाचा रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात तुरळक सरी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

तीन सप्टेंबरपासून १० सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असेल. त्यानंतर विदर्भाला फायदा होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भाला फायदा मिळू शकतो. त्या पुढच्या आठवड्यांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबद्दल खात्री कमी असली तरी नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाडा आणि कोकणाला फायदा होऊ शकेल.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

आज विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे, तसेच मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण राज्यात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील आणि ढगाळ वातावरणासह केवळ तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची नोंद होईल.

तर या या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा

आयएमडीने आज देशातील 17 राज्यांना महाअलर्ट जारी केला आहे. दिल्ली, यूपी, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, असाम, मेघालय आणि केरळमध्ये प्रचंड पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व भारतात विजांचा कडकडाट आणि वज्रपात होण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.पण याच उत्साहाला गालबोट लागलं आहे ते गोविंदांच्या जखमी होण्यामुळे. गोविंदा जखमी होण्याची पहिली दुर्घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या…

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    ५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी…

    Leave a Reply

    You Missed

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे