देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!

गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले उलथापालथीचे राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, परंतु महायुतीतील नेत्यांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ लागला. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा झाली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम होता.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर सहमत
आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. “शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हावं, अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शिवसेना (शिंदे गट) आमदार उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं सरकारमध्ये असणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. त्यांनी संघटन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्याचा विचार केला होता, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की ते सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभवावीत. आज त्यांचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद आहे.”

महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद?
“महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेतील,” असंही सामंत यांनी सांगितलं.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार अधिक स्थिर होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार…

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना