मढ-मार्वे रस्त्याचे धोकादायक काम प्रवाशांची प्रचंड गैरसोय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

मढ-मार्वे हा एक प्रमुख रस्ता असून, याच मार्गावरून लाखो प्रवासी व हजारो विद्यार्थी रोज प्रवास करतात. मढ, भाट्टी, येरंगळगाव, धारवलीगाव, अक्सागाव परिसरातील विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, S.Kumar Group – Shri Siddhi Kumar Infrastructure Pvt. Ltd. कंपनीने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट ठेवल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे धुळीचे मोठे ढग सतत हवेत पसरलेले दिसतात. शाळकरी मुले व प्रवाशांना श्वसनाचे विकार, सततचा खोकला आणि अस्वस्थता जाणवत आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या तब्येतीत झालेल्या घसरणीची माहिती पालकांना दिली आहे. बालवर्गातील मुलांचे आरोग्य गंभीरपणे बिघडत असल्यामुळे पालक प्रचंड चिंतेत आहेत.

प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वेळेत रस्ता मिळत नाही. एका पालकाने सांगितले की, “माझ्या मुलाची तब्येत बिघडली, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत एक,दोन तास गेला.

लहान मुलांचे हाल:

शाळेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांचे हाल अधिकच वाढले आहेत. मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. अनेक लहान मुलांनी लघवी रोखून ठेवणे, बस मध्येच करणे ,पोटदुखी, अशक्तपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेच्या बसचालकांनीही पालकांना याबाबत सतत माहिती देत आहेत…

वाहतूक नियोजन पूर्णपणे कोसळले आहे. शूटिंगसाठी येणाऱ्या गाड्या आणि अवजड वाहनांवर कोणतेही नियंत्रण नाही. प्रशासनाकडे वाहतूक वॉर्डनची संख्या कमी असून, त्यांना पगार वेळेवर दिला जात नसल्यामुळे अनेक कर्मचारी कामावर येत नाहीत. “कर्मचाऱ्यांकडे वॉकी-टॉकी सारख्या मूलभूत साधनांचीही कमतरता आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
मढ-मार्वे हा प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा मार्ग असल्यामुळे येथील पर्यटकही प्रचंड त्रस्त झाले आहेत. ट्रॅफिकमुळे प्रवासाचा आनंद हिरावला जात आहे, तर टॅक्सी आणि ऑटो रिक्षांचे भाडे या वाहतुकीमुळे चौपट वाढत आहे. स्थानिक व्यावसायिकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची माहिती अक्सा बीच वरील काही विक्रेत्यांनी दिली..

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “प्रशासनाला मोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का?”असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या S.Kumar Group – Shri Siddhi Kumar Infrastructure Pvt. Ltd. कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पालकांनी लावून धरली आहे. “आमच्या मुलांच्या जिवाशी खेळ थांबवा अशी पालकांनी ही प्रशासन,लोकप्रतिनिधी यांना विनंती केली आहे..


जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव,मालाड,मुंबई

  • Related Posts

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू