जगदीप धनखड आहेत कुठे?

मुंबई- सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनखड आहेत कुठे? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड २१ जुलैला तब्येतीचं कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. धनखड यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं, असा दावाही विरोधी नेत्यांकडून करण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर धनखड नेमके आहेत कुठे हा प्रश्न विचारला जातोय. कपिल सिब्बल यांनी यावरून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उत्तर मागितलंय. वेळ आली तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असा इशाराच सिब्बल यांनी दिलाय. धनखड हे भाजपाचे वरिष्ठ नेते, मोदींचे जवळचे आणि भाजपाचा जाट चेहरा अशी त्यांची ओळख.
धनखड राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक रित्या कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र या मुद्द्याची सुरुवात केली ते कपिल सिब्बल यांनी राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे अशी मागणी केली.अन्यथा धनखड यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यास भाग पडेल.यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.हेबियस कॉर्पस हा एक कायदेशीर मार्ग आहे जो व्यक्तींना बेकायदेशीर अटक किंवा तुरुंगवासाला न्यायालयात तक्रार करून आव्हान देण्यास सक्षम करतो.कपिल सिब्बल यांच्यापाठोपाठ संजय राऊतांनीसुद्धा यावरून सवाल उपस्थित केलाय. जगदीप धनखड यांच्या अचानक गायब होण्याबाबत आता हळूहळू विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. मात्र अद्यापही सरकारकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून धनखड यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीय . त्यामुळे नेमके धनखड कुठे आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

    “कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

    “Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it” अशा ओळींसह हा मॅनिफेस्टो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.    देशाच्या राजकारणात सध्या…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द