‘मातोश्री’वर बंधूप्रेम

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होतेय. कुणी या साहेबांसोबत जातंय तर कुणी त्या साहेबांसोबत. त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल हे काही सांगता यायचं नाही. म्हणजे ही सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. आता वळूया ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेकडे. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यानी, पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याच पण यंदाचा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस जास्तच खास आहे कारण राज ठाकरेंनी स्वतः मातोश्री निवासस्थानी जात उद्धव यांना शुभेच्छा दिल्यात. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर गेलेत. जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरेंची पाऊलं मातोश्रींकडे वळली आहेत. एरवी उद्धव ठाकरे सहसा कोणीही मातोश्रीवर आल्यावर गेटपर्यंत त्यांना घेण्यासाठी जात नाहीत. मात्र, आज राज ठाकरे आले तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या गेटवरच उभे होते. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी चर्चा मात्र होतेय ठाकरे बंधूंच्या युतीची. आता हया युतीची हवा महानगरपालिका निवडणुकीपर्यंत जाणूनबुजून दिली जातेय का असा सवाल उपस्थित होतोय कारण अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी ठाकरे बंधूंच्या युतीकडे डोळे लावून आहेत. कुणी फलक लावून ठाकरे बंधूंना साद घालतंय तर कुणी देवाजवळ साकडं घालतंय.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

    जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

    उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

    Leave a Reply

    You Missed

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई