राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आहेत . तरीही महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव काय करित आहेत हे कळत नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आमदार आणि खासदारांनी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट राज्य सरकार आमदार आणि खासदार यांच्या खात्यात काही गरज नसतांना दिवाळीपुर्वी वेतन देणार आहे. मात्र आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन देण्यात अपयशी ठरले आहे.वेतन दिवाळीच्या अगोदर मिळाले पाहिजे यासाठी सर्व स्थानिक आमदार आणि खासदार यांनी हा प्रश्न अत्यंत जलदगतीने शासनाच्या दरबारात पाठवुन न्याय मिळवून द्यावा. आरोग्य मंत्री , सचिव आणि आयुक्त यांनी या बाबत तात्काळ लक्ष वेधून वेतन करावे. PFMS पद्धतीने वेतन अदा करावे अशी अँक्टिव्हिटी केल्याशिवाय वेतन दिवाळी पूर्वी होणार नाही तसेच शासनाने जिल्ह्यांना लिमिट देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे . नवीन प्रणाली असल्याने कर्मचारी सुद्धा जीव लावून प्रयत्न करत आहेत .यात शंका नाही परंतु तांत्रिक गोष्टी बघता दिवाळी अगोदर वेतन होणे आवश्यक आहे . कंत्राटी कर्मचारी यांना वेतन नसल्यामुळे निराशा निर्माण झाली आहे. शासन दरबारी असलेल्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण काळोख्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बाबत सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे यांनी आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , यांना तात्काळ भ्रमणध्वनी वरुन आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी वेतन देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
तसेच आरोग्य मंत्री , वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून जुन्या पद्धतीने वेतन करण्याबाबत सूचना दिल्या.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    सूर्याचे अंडी – जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा

    आंबा म्हणजे भारताचे आवडते फळ, पण जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते. हा म्हणजे मियाझाकी आंबा, ज्याला जपानमध्ये “तायो नो तमागो” म्हणजेच “सूर्याचे अंडी” म्हणून ओळखले जाते.…

    Leave a Reply

    You Missed

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६