चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब महादेव कोठुळे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांच्या सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील बाळासाहेब कोठुळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात गेली पंधरा वर्षे निर्भीड आणि निष्पक्षपणे काम केले आहे. समाजातील प्रश्न, सामान्य नागरिकांचे विषय आणि जनहिताचे मुद्दे त्यांनी सातत्याने लेखणीच्या माध्यमातून मांडले. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.

दैनिक पुढारी कोल्हापूर, दैनिक पुणे प्रभात, दैनिक गावकरी नाशिक, दैनिक सार्वमत श्रीरामपूर यांसह महाराष्ट्राची भूमी, नगर परिवर्तन अशा साप्ताहिकांमधूनही त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. तसेच दैनिक लोकशक्ती, दैनिक लोक परिवर्तन, दैनिक रोखठोक, दैनिक साहित्य सेवा आणि दैनिक साहित्य तेज अशा विविध ऑनलाईन ई-पेपरमधूनही त्यांचे लिखाण सुरू आहे.

पत्रकारितेसोबतच साहित्य क्षेत्रातही बाळासाहेब कोठुळे यांचे गेल्या तीस वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. अनेक कवी संमेलने, साहित्य संमेलने आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांवरूनही त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक, संवेदनशील साहित्यिक आणि समाजभान जपणारे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.

त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानाबरोबरच संस्थेचे आमरण सदस्यत्वही त्यांना मिळाले असून, ही बाब त्यांच्या कार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे.

बाळासाहेब कोठुळे सरांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील निंबारी येथील कवी गोरक्षनाथ पवार, प्रा. मोहिनीराज होन सर, डॉ. बाळासाहेब वाहूरवाघ, अॅड. संजय माकोणे सर, ज्येष्ठ कवी आत्माराम शेवाळे आणि कवी राजेंद्र उदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या बाळासाहेब कोठुळे सरांचा हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

jj-mahanagar-blood-bank-maya-blood-centre-fda-action` मुंबई : रक्तसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांच्यावर मोठी कारवाई करत दोन्ही…

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत…

Leave a Reply

You Missed

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?