‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अश्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या आंदोलनावरून चांगलीच टीका केली आहे. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरही निशाणा साधला आहे.

आमदार प्रसाद लाड यांचा अभिजित दिपकेंवर निशाणा 

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्टंटबाजी करून सोशल मीडियावरून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी पोस्ट करत दिपके यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. ‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!” अश्या शब्दांत त्यांनी अभिजित दिपके आणि जंतर मंतर वरील आंदोलनाला लक्ष्य केले आहे.

स्टंटबाजी बंद करावी….

प्रसाद लाड म्हणाले की, “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी. लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे. NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…” असं म्हणत प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली आहे.


मुंबईतही उद्धव ठाकरेंकडूनही आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अन्नत्याग आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना मुंबईतही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी न करता केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.

या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

 जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगी नाही

दिल्ली पोलिसांनी २० जुलै २०२६ रोजी कॉकरोच जनता पार्टीने प्रस्तावित केलेल्या ‘संसद मोर्चा’बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चा किंवा आंदोलंनासाठी परवानगी दिलेली नाही किंवा अधिकृतपणे मागितलेली नाही. पोलिसांनी जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसोच सध्या जंतरमंतर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

जंतर-मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनही चिघळलं. हे सगळं सुरू असताना सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरून ‘3 इडियट्स’ चित्रपटाचा संबंध जोडण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी आमिर…

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी…

Leave a Reply

You Missed

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा  निर्णय

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी