जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार होता.मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी केवळ केरळ भवनापर्यंतच परवानगी दिली जणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगीही पोलिसांनी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या जंतरमंतर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या आंदोलनाचे स्वरूप काय?

दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनांची दिशा अत्यंत तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर आहे。प्रमुख आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी संसदेवर धडक देण्याचा इशारा दिला होता, परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी कलम १६३ (BNSS) अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली मध्ये सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध शेतकरी संघटनांचे नेते दाखल झाले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे जंतर-मंतर व्यतिरिक्त इतरत्र गर्दी जमण्यास बंदी आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलनस्थळी कोण-कोण पोहोचले आहेत?

विद्यार्थी अन् शेकडो समर्थक : अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली ‘कॉकरोच जनता पार्टी’चे शेकडो समर्थक आणि देशभरातून आलेले विद्यार्थी जंतर-मंतरवर उपस्थित आहेत.

शेतकरी संघटना: ‘देश बचाओ मोर्चा’ अंतर्गत हजारो शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत.

आजच्या आंदोलनाची दिशा काय?

संसद मार्च रोखला: आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याची घोषणा केली होती. मात्र, सुरक्षेसाठी आणि संसद अधिवेशनामुळे पोलिसांनी जंतर-मंतरव्यतिरिक्त अन्य भागात कलम १६३ लागू केले आहे.

पोलीस कारवाई: कोणत्याही अनधिकृत मोर्चाला किंवा ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जंतर-मंतरच्या सीमा सील केल्या आहेत आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

आंदोलकांची पुढील दिशा: सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून रुग्णालयात हलवल्यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सह विविध संघटनांनी आंदोलनाची तीव्रता कायम ठेवण्याचा आणि शांततापूर्ण मार्गाने लढा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान आंदोलनाच्या पुढील टप्प्याचे स्वरूप हे शांततापूर्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. आंदोलक कोणत्याही प्रकारची हिंसक कृती न करता जंतर-मंतरवरून आपल्या मागण्या मांडत आहेत. तसेच या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळताना देखील पाहायला मिळत आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षासह अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने याला राजकीय स्वरूपही येत आहे.

प्रमुख मागण्या

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, NEET आणि इतर परीक्षांमधील घोटाळ्यांची चौकशी, आणि भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापारी कराराला विरोध.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन जास्तच चिघळल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे.पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावल्याचही म्हटलं जात…

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैष्णोदेवी आणि अमरनाथ या दोन्ही यात्रांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हवामान अनुकूल होईपर्यंत…

Leave a Reply

You Missed

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा  निर्णय

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

‘दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत’,रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांचा पत्नीमार्फत देशवासीयांसाठी मोठा संदेश

‘दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत’,रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांचा पत्नीमार्फत देशवासीयांसाठी मोठा संदेश

लोकशाही आता व्हेंटिलेटरवर; सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबद्दल आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याची तळमळ

लोकशाही आता व्हेंटिलेटरवर; सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबद्दल आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याची तळमळ

विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन

विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन