दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.कॉकरोच जनता पार्टीने आज २० जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. जंतरमंतरवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून थेट कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. तरीही जंतर-मंतर येथे सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जमले आहेत. CJP चे संस्थापक अभिजीत दीपक यांनी स्पष्ट केले की, “आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून कोणतीही अनुचित कृती होणार नाही. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण राहील, जेणेकरून आंदोलनाची प्रतिमा बिघडू नये.” मात्र तरी देखील या मोर्चाला रोखण्यात येत आहे. यामुळेच आता आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवल्याचा आरोप
अभिजीत दीपके यांनी याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिल्ली पोलिसांवर आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवला असल्याचा आरोप केला आहे. सोबत त्यांनी काचा तुटलेली एक कार देखील आणल्याचा आरोप केला आहे. तसेच आता लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या टाकल्यानंतरही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले आहे.
Truck loaded with stones have been parked at Jantar Mantar.
What are the police authorities upto? Are they orchestrating stone-pelting on the peaceful CJP protesters? pic.twitter.com/luwTkVWI7S
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 20, 2026
” CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याची तयारी चालू आहे का?”
जंतर-मंतर परिसरात अचानक दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनी या दोन्ही वाहनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, “जंतर-मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाचा नेमका काय डाव आहे? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याची तयारी चालू आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
“दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे.”
तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,”दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे. आधीच जंतर-मंतरवर दगड भरलेला ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच मीडिया याची बातमी चालवेल की, आंदोलकांनीच या वाहनांची तोडफोड केली.” CJP ने हा प्रकार दिल्ली पोलिसांचा आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे आता हे आंदोलन कोणतं वळण घेणार , शांततापूर्ण हे आंदोलन चालणार की चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.








