दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबईतही महत्त्वाचा निर्णय
नीट पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारीविरोधात कॉकक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या संसद मोर्चापासून सुरू झालेले अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण संपवले आहे.पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला आहे की, जेपी नड्डा यांनी सरकारच्या वतीने त्यांच्याशी बोलण्यास सहमती दर्शवली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. जंतर मंतर येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश
मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत.
नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन
या आदेशानुसार, विनापरवानगी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येणे, मोर्चे, आंदोलन किंवा सार्वजनिक सभा घेण्यावर निर्बंध राहणार आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








