महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.या आंदोलनाचे पडसाद हे आता मुंबईतही दिसून येत आहेत. मुंबईत 23 जुलैपासून ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईतही महत्त्वाचा निर्णय

नीट पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारीविरोधात कॉकक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या संसद मोर्चापासून सुरू झालेले अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण संपवले आहे.पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला आहे की, जेपी नड्डा यांनी सरकारच्या वतीने त्यांच्याशी बोलण्यास सहमती दर्शवली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. जंतर मंतर येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश 

मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत.

नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन

या आदेशानुसार, विनापरवानगी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येणे, मोर्चे, आंदोलन किंवा सार्वजनिक सभा घेण्यावर निर्बंध राहणार आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज…

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

जंतर-मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनही चिघळलं. हे सगळं सुरू असताना सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरून ‘3 इडियट्स’ चित्रपटाचा संबंध जोडण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी आमिर…

Leave a Reply

You Missed

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा  निर्णय

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?

जंतरमंतरवर शेकडो समर्थक अन् विद्यार्थी; कडेकोट बंदोबस्त, थेट कलम १६३ लागू; काय असणार आंदोलनाची पुढची दिशा?