कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन जास्तच चिघळल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे.पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावल्याचही म्हटलं जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला.

आंदोलकांवर लाठीचार्ज

दरम्यान, सीजेपीने अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी हे नाकारले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यात अनेक आंदोलक जखमी झाल्याचं बोललं जात आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने मोर्चा वळवल्यानंतर केल्यावर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचले.

अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर

आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान सध्या जंतरमंतरवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून थेट कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. पण हा १६३ कलम आहे तरी काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

कलम १६३ कधी लागू केला जातो?

भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ ला नुसार, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास कार्यकारी दंडाधिकाऱ्याला त्वरित प्रतिबंधात्मक आदेश देण्याचा अधिकार आहे.

कलम १६३ चे मुख्य नियम व तरतुदी काय आहेत?

जमावबंदी: या कलमांतर्गत एखाद्या विशिष्ट भागात ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास, मोर्चा काढण्यास किंवा आंदोलन करण्यास बंदी घालता येते.

अधिकार: जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा इतर कोणत्याही अधिकृत कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्याला हे अधिकार असतात.

कालावधी: हे प्रतिबंधात्मक आदेश सहसा २ महिन्यांपर्यंत लागू केला जाऊ शकतात. पण काही विशेष परिस्थितींमध्ये राज्य सरकार ते ६ महिन्यांपर्यंत वाढवू शकते.

उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते? : या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (पूर्वीचे आयपीसी कलम १८८) नुसार शिक्षेची तरतूद आहे.

CJP च्या संसदेवरील प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि सुरक्षेचे कारणास्तव दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात या कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार