कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन जास्तच चिघळल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे.पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावल्याचही म्हटलं जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला.

आंदोलकांवर लाठीचार्ज

दरम्यान, सीजेपीने अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी हे नाकारले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यात अनेक आंदोलक जखमी झाल्याचं बोललं जात आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने मोर्चा वळवल्यानंतर केल्यावर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचले.

अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर

आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान सध्या जंतरमंतरवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून थेट कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. पण हा १६३ कलम आहे तरी काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

कलम १६३ कधी लागू केला जातो?

भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ ला नुसार, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास कार्यकारी दंडाधिकाऱ्याला त्वरित प्रतिबंधात्मक आदेश देण्याचा अधिकार आहे.

कलम १६३ चे मुख्य नियम व तरतुदी काय आहेत?

जमावबंदी: या कलमांतर्गत एखाद्या विशिष्ट भागात ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास, मोर्चा काढण्यास किंवा आंदोलन करण्यास बंदी घालता येते.

अधिकार: जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा इतर कोणत्याही अधिकृत कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्याला हे अधिकार असतात.

कालावधी: हे प्रतिबंधात्मक आदेश सहसा २ महिन्यांपर्यंत लागू केला जाऊ शकतात. पण काही विशेष परिस्थितींमध्ये राज्य सरकार ते ६ महिन्यांपर्यंत वाढवू शकते.

उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते? : या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (पूर्वीचे आयपीसी कलम १८८) नुसार शिक्षेची तरतूद आहे.

CJP च्या संसदेवरील प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि सुरक्षेचे कारणास्तव दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात या कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक