जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने मांडली रोखठोक भूमिका; म्हणाला,’माझे बाबापण प्रोफेसर….’

नीट पेपर लीकमुळे देशभरातली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. या हे आंदोलन आता फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न राहता त्याचे पडसाद देशभर पसरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नीट पेपर लीकच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी एकवटले आहेत. राजकीय मंडळी, काही सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच आता सचिन तेंडुलकरे एक्सवर एक खास पोस्ट शेअर करत याबाबत त्याचं मत मांडलं आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरचे ट्वीट

सचिनने ट्वीट करत म्हटलंय, “विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, तिथे मेरिटचा विजय होवो”. पुढे तो म्हणाला की, “माझे वडील देखील एक प्रोफेसर होते.ते अनेक तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक आणि सल्लादार होते.त्यांनी मला सुरुवातीपासूनच एक गोष्ट शिकवली होती, अपयश ठीक आहे, पण चीटिंग करणं नाही. कधीही शॉर्टकट स्वीकारू नको. समाजात मोठं असल्याने आपली जबाबदारी आहे की, संस्कृतीला योग्य दिशा द्या.जो समाज मेहनती शिवाय निकालांना जास्त महत्व देतो, तो क्षमेतेपेक्षा शॉर्टकटला निवडतो”.

‘जेव्हा विद्यार्थी नैराश्यात आहेत….’

सचिनने पुढे म्हटलं, “आज, जेव्हा विद्यार्थी नैराश्यात आहेत, कारण त्यांच्या कठोर मेहनतीचा त्यांना फळ मिळालं नाही, तर त्यांची नाराजी समजली जाऊ शकते. आपण सर्वांनी मिळून हे निश्चित केलं पाहिजे की,त्यांच्यापुढे पुन्हा अशी स्थिती निर्माण न होवो. तरुण भारत स्वप्न आणि उर्जेने भरलेला आहे. तो आमच्या यशाचा आधार आहे.”


सचिन तेंडुलकरने मांडली रोख-ठोक भूमिका 

एवढंच नाही तर तो पुढे म्हणाला की, “एक समाज म्हणून, आई-वडील, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि एडमिनिस्ट्रेटर आपल्या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. वेगवेगळ्या भूमिका आहेत. जेणेकरून आपले तरुण नेहमीच उत्साहित आणि उर्जावान राहतील. आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल, जिथे कठोर मेहनतीला प्राधान्य दिलं जाईल. प्रामाणिकपणाला महत्त्व मिळेल आणि क्षमतेचा विजय होईल. मला विश्वास आहे की, आपण सर्व मिळून असा पर्याय काढू,जो आपल्या मुलांच्या भविष्याला मजबूत करेल आणि त्यांच्या अपेक्षांना सुरक्षीत ठेवेल. जय हिंद”. अशी भूमिका मांडत त्याने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचं आवाहन करत त्यांच्या या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दर्शवला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक