तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला होता. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभागकडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं.

24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार

गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आता तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आता तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांना हाय अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा अशा 17 रांज्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची देखील शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची तूट झाली आहे, सोलापूर जिल्ह्यात तब्बल 33 टक्के इतकी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने, पावसाची तूट निर्माण झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच असून, पुढील दोन महिने महाराष्ट्रात सरासरी पावसाची अपेक्षा आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस.डी सानप यांनी वर्तवला आहे. यंदा राज्यात पावसाचं प्रमाणा हे असमान राहिलं आहे, काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाकडून कारवाया धडाका सुरूच आहेत. आता मुंबईतील दहिसर आणि मालाडमध्ये दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

Leave a Reply

You Missed

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम