उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

  मुंबई – सोमवारी रात्री उशिरा जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. स्वतः धनखड यांनी १० जुलैला झालेल्या एका कार्यक्रमात, मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन असं म्हटलं होतं. त्यामुळंच त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. पण धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार ? याच्या चर्चाही आता सुरू झाल्यात. यामध्ये काही नावांच्या चर्चा होतायत. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असल्याचंही सांगितलं जातंय. नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती पद देण्यासाठी जगदीप धनखड यांच्याकडून राजीनामा घेण्यात आल्याचंही बोललं जातंय. काहींचे म्हणणे आहे कि हा भाजपाचा मोठा डाव आहे आता उपराष्ट्रपतीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा का होतेय? जाणून घेऊयात
बिहारमध्ये वर्षाकाठी निवडणुका होऊ घातल्यात. ही निवडणूक भाजपा आणि जेडीयू पक्ष एकत्रित लढणार आहेत. भविष्यात भाजपाला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवाय पण नितीश कुमार जोवर बिहारच्या राजकारणात सक्रिय आहेत तोवर तरी हे शक्य नाहीच. नितीश कुमार यांचा कुर्मी समाज आणि ओबीसी समाजावर मोठा प्रभाव आहे, पक्कड आहे. त्यामुळेच बिहारमध्ये नितीश कुमारांची कोणत्याही प्रकारची नाराजी ओढावून घेणं भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळेच नितीश कुमार यांना दिल्लीत उपराष्ट्रपती म्हणून पाठवायचं आणि बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार द्यायचा असा भाजपाचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. बिहारमध्ये ओबीसी आणि इबीसी मिळून एकूण ६३ टक्के लोकसंख्येवर नितीश कुमारांची पक्कड आहे. त्यामुळेच नितीश कुमारांना उपराष्ट्रपतिपदासारखं सर्वोच्च पद दिल्याने बिहार निवडणुकीत भाजपाला फायदाच होणार आहे . पण हे हि महत्त्वाचं आहे कि बिहारच्या लोकसंख्येत नितीश कुमारांची लोकप्रियता कमी होत चाललीय. नितीश कुमार यांनी अनेक वेळा आपल्या फायद्यासाठी युत्या बदलल्या कधी ‘राजद’सोबत, कधी ‘रालोआ’सोबत त्यांनी युती केली आणि पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांचे वयही वाढत आहे, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काहीशी सुस्ती आल्याचं ही बोललं जातंय. नितीश कुमार यांना आधीपासून राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा आहेच २०१३ मध्ये मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर नितीश नाराज झाले होते पुढे त्यांनी एनडीएची साथ सोडत विरोधकांची आघाडी बनवली आणि तिथेही त्यांनी पंतप्रधान बनण्याचे प्रयत्न केले होते पण त्यांना सोयीस्कररीत्या डावलण्यात आलं. त्यांनतर ते पुन्हा एनडीएत सहभागी झाले आता बिहारमध्ये त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याने बिहार सोडून दिल्लीत जाणं हेच नीतीश यांच्यासाठी फायद्याचं आहे असं जाणकार सांगतात

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.…

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    तमिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठा पेच संपुष्टात आला असून, ‘तमिळगा वेत्री कळघम’ म्हणजेच TVK पक्षाचे प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. गुरुवारी ७ मे रोजी विजय यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!