‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमधील घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं वेगळं झालं आहे. लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबाबतची एक पोस्ट करून त्यांनी चाहत्यांना धक्काच दिला आहे.

अखेर नात्याला पूर्णविराम 

दरम्यान आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात अलबेल नसल्याची चर्चा तशी बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. अखेर त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे.आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊन चाहत्यांनाही विचारत पाडलं आहे.गुरुवारी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर कायम ठेवत पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची मुलगी जिजासाठी मात्र दोघेही सह-पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“खूप विचार केल्यानंतर, आम्ही…” पोस्ट चर्चेत

2025 पासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय “खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत चाहत्यांना ही माहिती दिली.

Urmila and Adinath Post
Urmila and Adinath Post

पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला 

आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र आता या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.



															
Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६ ,द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’ हा महोत्सव मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाद्वारे आयोजित ‘अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’…

अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम

फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनची १५३ वी शतकोत्तर वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न. छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना)…

Leave a Reply

You Missed

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!

तर लोकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; खारफुटीच्या ऱ्हासावर मुंबई उच्च न्यायालयाची अतिशय गंभीर चिंता!

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड