अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम

फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनची १५३ वी शतकोत्तर वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने “मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एखाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेतील विधानाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील ऐतिहासिक प्रासंगिक विषयावर १५३ वी शतकोत्तर वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संस्थेचे कार्यालय साकेत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे १८ जानेवारी २०२६ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी.बी. मेश्राम  म्हणाले की, १९ जानेवारी १९३१ ला गोलमेज परिषदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले होते की, एखाद्या देशाच्या राजकीय जीवनाचे सुसूत्रीकरण करण्याचे प्रयत्न करीत असताना उत्तरदायी शासन आणि प्रातिनिधिक सरकार या दोन बाबींना प्राथमिकता दिली पाहिजे. कुठल्याही देशातील जनतेवर राज्य करीत असताना जनतेला दारिद्र्यात ठेवून राज्य करणे आणि जनतेला दारिद्र्यातून बाहेर काढून राज्य करणे या दोन भिन्न बाबी आहेत. म्हणून जनतेने सभागृहात सक्षम प्रतिनिधी पाठविले पाहिजेत आणि त्या पुढार्‍यावरती जनतेने करडी नजर ठेवली पाहिजे. हे करण्यासाठी अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे. करिता समग्र आंबेडकरवाद जनमानसावर बिंबविला पाहिजे. कुटुंब हा समाजाचा प्रमुख घटक असल्यामुळे ज्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे. लोकशाहीची स्पष्टता कुटुंबातील सदस्यांना यावी म्हणून कुटुंबात संसदीय प्रणाली राबविली पाहिजे. समतायुक्त मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी देशव्यापी परिवर्तनवादाची चळवळ चालवीत असताना दक्षिण भारतात होऊन गेलेल्या आदर्शांना उत्तर भारतात तर उत्तर भारतात होऊन गेलेल्या आदर्शंना दक्षिण भारतात प्रचारीत आणि प्रसारित केले पाहिजे. तसेच २२ डिसेंबर १९५२ ला पुण्याच्या लाल लायब्ररीमध्ये दिलेल्या संदेशात या देशांमध्ये संसदिय लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्या अटी आणि शर्ती यांचे पालन केले पाहिजे हे स्पष्ट केलेले आहे. त्याचे आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून भारतीय नागरिकांचे परिवर्तनवादाच्या अनुषंगाने जनमत तयार होऊ शकेल. या बाबीचे समाज जीवनात संचलन व्हावे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे, असे म्हटले होते. याची जनतेला प्रचिती यावी म्हणून आपण या प्रासंगिक विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे समन्वयक उद्योजक शशिकांत काळे म्हणाले की, नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत बिनविरोध प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेवरून असं लक्षात येते की येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा खासदार बिनविरोध निवडून पाठविले जातील की काय? अशी शंकास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यातील काही नेते मंडळी शत्रू सोबत हात मिळवणी करून चळवळीचे नुकसान करून घेत असतात. याची जाणीव ठेवून आपण मार्गक्रमण केले पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. सुनील कुमार नागवंश म्हणाले की, ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले असले तरी त्यांनी आपणास शिक्षणाची द्वारे खुली करून मानवी हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. या देशाला न्याय देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात, याची जाणीव असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गोलमेज परिषदेत बोलावले होते. ज्यात आंबेडकरांनी आपले म्हणणे सभागृहाला पाठवून दिले ज्याला केवळ गांधींनी विरोध केला होता. परिणामी पुणेकरारातील तडजोडीनुसार स्वतंत्र मतदार संघाऐवजी नाईलाजाने संयुक्त मतदार संघ पद्धती स्वीकारावी लागले. करिता शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये.
याप्रसंगी महादेव डांबरे म्हणाले की, आपण साउथ बरो व सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेतील कार्यवाही समजून घेतली पाहिजे. डॉ. व्ही. एच. कांबळे म्हणाले की, चळवळीसाठी संसाधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. ॲड. आर. एम. गायकवाड म्हणाले की, समाजातील कुठल्याही घटकाला दुर्लक्षित न करता सर्व वयोगटासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. कुटुंब हाच लोकशाहीचा प्रमुख घटक आहे. प्रा. डॉ. ए. आर. केवटे म्हणाले की, आपले विचार आणि आचरण हे पारदर्शक असावे. शासन प्रशासनावर परिणाम करणारी व्युहरचना असावी. उद्योजक मिलिंद बागुल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून लोकशाहीचा पाठीराखा घोषित करताना एकाधिकारशाहीचा विघ्वंसक असल्याचे सिद्ध केले. ॲड. विलास रामटेके म्हणाले की, चर्चेशिवाय निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे होय.
याप्रसंगी प्रा. शिवम गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. सुरुवातीला आदर्शांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून स्टडी फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. ॲड. विलास रामटेके यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक प्रा. विलास कटारे यांनी व आभार प्रा. शिवम गायकवाड यांनी व्यक्त केले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा