बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’ बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही काळ बाकी असला तरी, त्याचा ट्रेलर मात्र आतापासूनच चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता, निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे.

‘रामायण’चा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होईल

‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “शुभ ब्रह्म मुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता, आम्ही ‘रामायण’च्या ट्रेलरचे जगभरात स्वागत करत आहोत.” म्हणजेच चित्रपटाचा ट्रेलर ३० जुलै रोजी, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)


चित्रपटाच्या टीमने नुकतेच दिल्लीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी ट्रेलरची झलक दाखवण्यात आली आणि चित्रपटाच्या कलाकारांची पहिल्यांदाच ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२६ मध्ये देखील सादर करण्यात आला होता.

‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित केले जाईल 

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी २०२७ साली दिवाळीत प्रदर्शित होईल. रणबीर कपूर ‘राम’, साई पल्लवी ‘सीता’, सनी देओल ‘हनुमान’, यश ‘रावण’ आणि रवी दुबे ‘लक्ष्मण’ यांच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे बजेट ४,००० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटावर जगभरातील हजारो कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी काम केले.त्यामुळे ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढणार आहे हे नक्की.

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

जंतर-मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनही चिघळलं. हे सगळं सुरू असताना सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरून ‘3 इडियट्स’ चित्रपटाचा संबंध जोडण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी आमिर…

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सलमान खान नुकताच मुंबईतील ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’कार्यालयातील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्या दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला कारण यात सलमानचे शरीर…

Leave a Reply

You Missed

पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार