सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३० एकर वनजमीन पुन्हा वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना मोठा झटका बसला आहे.

नारायण राणेंचा निर्णय रद्द

सन १९९८ मध्ये, युती सरकारच्या काळात तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी पुण्यातील ही जमीन एका खासगी व्यक्तीला दिल्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांतच ती जमीन ‘रिची रिच सोसायटी’ला दोन कोटींना विकण्यात आली आणि पुढे त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभारण्याचा डाव आखण्यात आला.

अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद

या प्रकरणात तत्कालीन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उपवन संरक्षक अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमिनीस बिगरशेती घोषित करून बांधकामाचा मार्ग मोकळा केला. मात्र सजग चेतना मंच या सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या व्यवहाराविरोधात आवाज उठवला.

CECचा अहवाल आणि पुराव्यांची फेरफार

सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत २००२ मध्ये सेंट्रली एम्पॉवर्ड कमिटी (CEC) स्थापन केली. समितीने पुण्याला भेट देऊन अहवाल सादर केला, ज्यात तत्कालीन मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. इतकंच नव्हे, तर पुरातत्त्व खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करून बनावट पुरावे सादर करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं. या बनावामुळे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

देशभरात फेरचौकशीचे आदेश

या निर्णयात सरन्यायाधीश गवई यांनी केवळ पुण्यापुरतेच नव्हे, तर देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत की, अशाप्रकारे जर कुठेही वनजमिनी हडप केल्या गेल्या असतील, तर त्यांची तपासणी करून एक वर्षाच्या आत त्या सरकारजमा करण्यात याव्यात. बांधकाम झालेल्या जमिनी बाबतीत बाजारभावानुसार मोबदला वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

“हे राजकारणी-बिल्डर-अधिकाऱ्यांच्या संगनमताचे उदाहरण”

निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “ही केस म्हणजे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यातील संगनमताचे जिवंत उदाहरण आहे.” या निर्णयाने न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेला चालना मिळाली असून, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही तो एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या जबरदस्त प्रत्युत्तराची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. भारतीय सैन्यदलांनी ७ मे ते १० मे या कालावधीत राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज…

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    Watermelon death case:पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्लेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींना अवघ्या काही तासांतच…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द