वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. मढ, भाट्टी, अक्सा, पटेलवाडी येथून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचा मानसिक त्रास आणि आर्थिक खर्च वाढला आहे.

वर्सोवा गल्लीतून बोट धक्क्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा अवघा 500 मीटरचा प्रवास कधी कधी 20-30 मिनिटांचा ठरतो. रस्त्यावर अवैध पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण आणि विक्रेत्यांच्या गर्दीमुळे हा प्रवास डोकेदुखी ठरतो. मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा हा एकमेव पर्याय असतो, पण येथे फक्त शेअर ऑटोच उपलब्ध होतात. प्रत्येक प्रवाशाला 25 रुपये मोजावे लागतात, जिथे मीटरनुसार भाडे 45 रुपये असते. एका तीन व्यक्तींच्या कुटुंबाला 75 रुपये खर्च येतो. परत घरी येताना वाहतूक कोंडीमुळे ऑटो मिळणेही दुरापास्त झाले आहे.

सात बंगला ते मच्छीमार बस स्टॉप रस्त्यावर हॉटेल्सच्या गाड्यांनी रस्ते व्यापले आहेत. फुटपाथ गायब झाले असून, नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणार कसे? मनपा प्रशासनाने याची तपासणी करणे गरजेचे आहे.

वाहतूक प्रशासन आणि पोलिसांचा येथे अभाव जाणवतो. वाहतूक नियंत्रणाऐवजी केवळ सिग्नलवर कारवाई करण्यात प्रशासन व्यस्त आहे. स्थानिक प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन अन्य कामात गुंतले आहे. यामागे ‘मलिदा’ मिळत नसल्याचे कारण असावे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

    महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनर्उच्चारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या उपोषणामुळे हा मुद्दा एकदाच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा वेळी, राज्य सरकार कोणत्या…

    Leave a Reply

    You Missed

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६