वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. मढ, भाट्टी, अक्सा, पटेलवाडी येथून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचा मानसिक त्रास आणि आर्थिक खर्च वाढला आहे.

वर्सोवा गल्लीतून बोट धक्क्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा अवघा 500 मीटरचा प्रवास कधी कधी 20-30 मिनिटांचा ठरतो. रस्त्यावर अवैध पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण आणि विक्रेत्यांच्या गर्दीमुळे हा प्रवास डोकेदुखी ठरतो. मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा हा एकमेव पर्याय असतो, पण येथे फक्त शेअर ऑटोच उपलब्ध होतात. प्रत्येक प्रवाशाला 25 रुपये मोजावे लागतात, जिथे मीटरनुसार भाडे 45 रुपये असते. एका तीन व्यक्तींच्या कुटुंबाला 75 रुपये खर्च येतो. परत घरी येताना वाहतूक कोंडीमुळे ऑटो मिळणेही दुरापास्त झाले आहे.

सात बंगला ते मच्छीमार बस स्टॉप रस्त्यावर हॉटेल्सच्या गाड्यांनी रस्ते व्यापले आहेत. फुटपाथ गायब झाले असून, नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणार कसे? मनपा प्रशासनाने याची तपासणी करणे गरजेचे आहे.

वाहतूक प्रशासन आणि पोलिसांचा येथे अभाव जाणवतो. वाहतूक नियंत्रणाऐवजी केवळ सिग्नलवर कारवाई करण्यात प्रशासन व्यस्त आहे. स्थानिक प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन अन्य कामात गुंतले आहे. यामागे ‘मलिदा’ मिळत नसल्याचे कारण असावे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा Mumbai Metro Aqua Line 3 मुंबई : मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 मधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची…

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाला आता वेग आला आहे. पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोस्टल रोडच्या उत्तर भागात तब्बल…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द