“राज-उद्धव-शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना” – गजानन कीर्तीकर यांचा मोठा संदेश, भाजपवरही निशाणा

शिवसेनेच्या एकसंघतेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आणि शिंदे गटातील शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना आहे. आम्ही ज्या शिवसेनेसाठी लढलो, ती पुन्हा उभी राहण्यासाठी ही तिघांची एकता अत्यावश्यक आहे.”

बाळासाहेबांचा वारसा आणि शिवसेनेचं विभाजन

गजानन कीर्तीकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही त्यांनी राज आणि उद्धव यांच्यातील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाचे विभाजन झाले आणि शिवसेना व मनसेमुळे मूळ विचारधारेला धक्का बसला. आज शिवसेना दोन भागांमध्ये विभागली गेली आहे — एकनाथ शिंदेंची भाजपसोबत असलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील शिवसेना.

अटी योग्य – पण विचारधारा पुन्हा एक करणे गरजेचे

राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, ही अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. दोघांनी काही अटी घातल्या आहेत, त्या योग्यच आहेत, कारण एक मजबूत शिवसेना तयार करण्यासाठी काही स्पष्ट भूमिका आवश्यक असतात. गजानन कीर्तीकर म्हणतात की, “आज शिवसेना भाजपप्रणित आणि काँग्रेसप्रणित झाली आहे, पण शिवसैनिकांना हवी आहे ती बाळासाहेबांची मूळ विचारधारा.”

शिंदेंनाही सोबत यावं लागेल

“जर शिवसेना पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांवर उभी करायची असेल, तर राज आणि उद्धव यांच्यासोबत शिंदेंनीही यावं लागेल,” असं मत व्यक्त करत कीर्तीकर यांनी तिघांच्या एकत्र येण्यावर भर दिला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व, आक्रमक भूमिका, मराठी अस्मिता आणि राष्ट्रीयत्व यांचे प्रतिनिधित्व करणारी शिवसेना पुन्हा उभी करायची असेल तर ही त्रिमूर्ती एकत्र येणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

भाजपवर निशाणा – “विभाजित शिवसेना भाजपला हवी आहे”

गजानन कीर्तीकर यांनी भाजपवरही परखड टीका केली. “भाजपला शिवसेना एकत्र हवी नाही, त्यांना ती विभाजितच हवी आहे. उद्धव ठाकरेंनी सोबत दिली, आता शिंदेंनी दिली, पण अखंड शिवसेना नसल्यामुळे भाजपला पूर्ण ताकद मिळालेली नाही. त्यामुळे भाजपच्या डावपेचात शिवसेनेचं एकत्र येणं घातक ठरेल, म्हणून ते याला विरोध करतील,” असं ते म्हणाले.

अखंड शिवसेनेसाठी पुढाकार घेणार – गजानन कीर्तीकर

कीर्तीकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मी बाळासाहेबांसोबत अनेक वर्षं काम केलंय. मला अधिकार आहे. मी राज, उद्धव आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन. पुन्हा आमचे जुने दिवस येण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील.”

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

    जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

    उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड