वरंध निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना; उद्धव ठाकरे गटाची पूर्वा सुर्वे रिंगणात

महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण, तर वरंध पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला, आणि खरवली पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिला आरक्षण घोषित झाले आहे. मागील निवडणुकीत या जिल्हा परिषद गटातून मनोज काळीजकर यांनी बाजी मारली होती, तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी आता एकाच पक्षात आल्याने आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून वरंध पंचायत समिती गणात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते. हा मतदारसंघ मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत सपना मालुसरे यांनी याच गणातून विजयी होत पंचायत समिती सभापतीपद पटकावले होते. आता मात्र या जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असून पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची होणार आहे.

दरम्यान, मंत्री गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले-मालुसरे, नूतन गोपाळ मोरे (विद्यमान सरपंच, निगडे ग्रामपंचायत) आणि माजी सभापती सपना मालुसरे या तिन्हींची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे, या गणातून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही आपली ताकद दाखवली आहे. उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांचा पाठिंबा त्यांना लाभल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात आता शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वरंध पंचायत समिती गणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

CLICK AND BUY

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

“Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it” अशा ओळींसह हा मॅनिफेस्टो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.    देशाच्या राजकारणात सध्या…

Leave a Reply

You Missed

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द