विद्यार्थी आंदोलनाबाबत ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, थेट रस्त्यावर उतरणार; २६ जुलै रोजी मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीयमंडळींपर्यंत सर्वांचाच पाठिंबा मिळात आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्त होणारा रोष पाहता आता ठाकरे बंधूंनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

ठाकरे बंधूंचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट रस्त्यावर उतरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले असून २६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीविरोधात आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संयुक्त मोर्चाची रणनीती आणि आराखडा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे विशेष पत्रकार परिषद घेणार आहे.

२६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चा

दरम्यान याआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता थेट देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याने २६ जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या या भव्य संयुक्त  मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे आक्रमक

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलपणा शिल्लक आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांसारखा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही.”

एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आणि नागरिकांना २४ जुलै रोजी चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊया आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया,” असे आवाहन त्यांनी केले.


अण्णा हजारेंचीही साथ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे आज गुरुवारी (२३ जुलै २०२६) ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक